बदली

Wednesday, 9 April 2025

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना.....


नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुटका थोड्या वेळासाठी आहे.कारण त्याच्यापुढे आता एक नवीन Mission असेल. ते म्हणजे करिअर ..!

            आता करिअरच्या दृष्टिकोनातून कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचे असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या मनात असतो.आणि त्या पेक्षा जास्त चिंता असते ती पालकांना...विद्यार्थ्यांची वयोमानानुसार निर्णय क्षमता तेवढी प्रगल्भ नसल्याने विद्यार्थी जास्तीत जास्त पालकांच्या निर्णयावर अवलंबून असतात.

       थोडक्यात पालक सांगतील ते आम्ही करू असे सहज बोलून जातात. काही विद्यार्थी आपल्या परिचयातील व्यक्तीचे यश व जीवनशैली चे अनुकरण करण्याची इच्छा मनात ठेवून त्या व्यक्तीने निवडलेले क्षेत्र निवडतात.

 10वी व 12 वी च्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये नातेवाईक पेक्षा मित्रांची BONDING तीव्र असल्याने ते मित्र जे करिअर निवडेल किंवा कॉलेज मध्ये प्रवेश घेईल तिथेच मी प्रवेश घेईल अशी भावना असते.

आपल्या पाल्याच्या करिअर निवडण्यात पालकांची सर्वात मोठी चूक म्हणजे दुसऱ्यांच्या मुलांसोबत तुलना करणे तसेच पाल्याच्या करिअरला आपली स्वतःची स्पर्धा समजणे. दुसऱ्यापेक्षा माझ्या मुलाला मोठं करण्याची अपेक्षा!

वरील वस्तुस्थिती लक्षात घेता सुरुवातीच्या काळात म्हणजे 10th व 12 th नंतर करिअर हे विद्यार्थी केंद्रीत नसून ते पालक केंद्रित असते.मात्र हेच करियर ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थी केंद्रीत होते. कारण तेव्हा विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता विकसित झालेली असते.ते त्यांचे निर्णय घेण्यात सक्षम असतात.तेव्हा आपले निवडलेले करिअर बरोबर होते की चुकीचे ते समजते.आणि जर निर्णय चुकला असेल तर ते मात्र आपल्या पालकांना दोष देत बसतात.म्हणून पालकांनी आपल्या पाल्याची तुलना दुसऱ्यांसोबत न करता आपल्या पाल्याच्या क्षमता व गरज विचारात घेऊन करिअर निवडले पाहिजे.आपल्या मुलाला / मुलीला कोणते क्षेत्र आवडते त्यापेक्षा ते कोणत्या क्षेत्रात चांगले करू शकतात ते जाणून घ्यावे.त्यांची क्षमता विचारात घेऊन करिअर निवडल्यास पाल्यावर कधीही मानसिक ताण किंवा अभ्यासाचा ताण पडत नाही.आपल्या निवडलेल्या क्षेत्रात ते चांगले असल्याने त्यात प्राविण्य मिळविण्यास त्यांना वेळ लागत नाही.प्राविण्य मिळवल्यानंतर समाजाकडून मिळणाऱ्या कौतुकाचा वर्षाव त्यांना आपण यशस्वी झाल्याची जाणीव करून देत असतो.

           करिअर निवडतांना विद्यार्थ्यांनी सुद्धा विचार करणे आवश्यक आहे.आपला मित्र जे क्षेत्र निवडणार आहे म्हणून मी तेच क्षेत्र निवडेल असा अट्टाहास सोडावा. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी वेळ लागतो.म्हणून असे झटपट पैसे मिळवण्याचे स्वप्न सोडून प्रामाणिक प्रयत्न करावे.जे काही क्षेत्र तुम्ही स्वतः किंवा पालकांच्या इच्छेने निवडणार आहेत.त्यात तुम्ही बेस्ट बनण्याचा प्रयत्न करा. त्याचे पूर्ण knowledge मिळवा. अपूर्ण knowledge घेतले तर तुम्हाला नोकरी शोधावी लागते. याउलट तुम्ही जर पूर्ण knowledge घेतले व त्यात प्राविण्य मिळवले तर नोकरी देणारे तुम्हाला शोधत येतात.

करिअर हा आयुष्यातील खूप महत्वाचा निर्णय आहे. त्यात तुम्ही केलेली चूक सुधारण्यात अनेक वर्ष फुकट जातात. त्यामुळे निवडलेल्या क्षेत्रात बेस्ट बनण्याचा प्रयत्न करा. अनेक विद्यार्थी पहिल्यांदा निवडलेले क्षेत्र सोडून इतरच क्षेत्रात करिअर करतात. बरेच विद्यार्थी आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्पुरते काम करून Enjoy करतात. ( जसे.- महागडे फोन घेणे, गाडी घेणे) मात्र शैक्षणिक करिअरकडे दुर्लक्ष करतात. परिणामी वयोमान वाढल्याने पश्चात्ताप करण्याची वेळ येते. त्यामुळे करिअर बाजूला ठेवून तेच काम चालू ठेवावे लागते.काही अपवाद विद्यार्थी घराच्या परिस्थिती आणि मजबूरीमुळे काम करता करता शिक्षण घेतात.त्यांना परिस्थिती जाणीव असल्याने ते तात्पुरत्या रोजगारापेक्षा मिळणाऱ्या वेळात अभ्यास करून यश प्राप्त करतात. 

         म्हणूनच करिअर निवडतांना आपल्या क्षमतांचा विचार करा. आपले नातेवाईक किंवा परिसरातील यशस्वी लोकांचा सल्ला घ्या.आपले शिक्षक यांचा सल्ला घ्या. ध्येय निश्चित करायचे असेल तर त्यासाठी वेळ द्या. ध्येयबद्दल पूर्ण जाणून घ्या.अनेक मार्गदर्शक तसेच यशस्वी लोकांचे जीवन चरित्र पडताळून पहा.त्यामुळे त्यांनी केलेली मेहनतीमुळे त्यावरून तुम्हाला प्रेरणा मिळेल. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होणार आहे. आपले करिअर आपल्याच हातात आहे.

आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असलेले विद्यार्थी जीवनात कधीही अयशस्वी होत नाहीत. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ....!!!

 


भावेश सत्यवान पाटील - लिपिक, मंत्रालय

Saturday, 20 January 2024

माझी शाळा सुंदर शाळा टाईप करायची माहिती

 माझी शाळा सुंदर शाळा टाईप करायची माहिती 



अ(१) विद्यार्थीमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट हा उपक्रम अंतर्गत आपल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अवश्य क असलेले वस्तू पासून विविध शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले त्या मधुन निवडक शैक्षणिक साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांनी वर्ग सजावट केली सध्या इमारत दुरुस्ती काम चालू असल्यामुळे शाळा सजावट केली नाही तरी वर्ग सजावट 

केलेली फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे या अगोदर वर्ग आणि शाळा रंग रंगोटी करण्यात आले होते ‌‌

 अ(२) आपल्या शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभर लावण्यासाठी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे या मध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आले माळी व विद्यार्थी कर्मचारी वर्ग या वृक्षाची देखभाल करण्यासाठी सतत प्रयत्न करतात व पर्यावरण जनजागृती साठी शाळेत वृक्षारोपण उपक्रम मान्यवर विद्यार्थी पालक यांना आमंत्रित करण्यात येत आहे शाळेत करण्यात आलेली वृक्षारोपण फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आह

अ(३) आपल्या शाळा ही इमारत मध्ये भरत आहे आणि इमारतीला पक्का भिंत आहे सध्या इमारत दुरुस्ती चालू आहे या अगोदर संरक्षक भिंती रंगरंगोटी करण्यात आले होते याबाबतची फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे भिंती वर शासनानेचे योजना दर्शन भागात लिहिले आहे

अ(४) आपल्या शाळेत भिंती वर चित्र इतर माहिती उभारणी करण्यात आली आहे सध्या इमारत दुरुस्ती काम चालू आहे काही चित्रे सुविचार दरस्तीत खराब झाले आहे भिंती वरील माहिती या बाबती फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

अ(२) (१) आपल्या शाळेत विद्यार्थी मंत्री मंडळ स्थापन करण्यात आली या मध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री स्वच्छता मंत्री असे विविध खाते बाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाची माहिती दिली शाळेच्या दैनंदिन कामे सरळीत पार पडण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापकांनी मंत्री मंडळची कामकाज निरिक्षण व मार्गदर्शन करतात आपल्या माहिती करीता शाळेच्या मंत्रिमंडळ फोटो सदर करीत आहे

अ(२)(२) सध्या आपल्या शाळेचे इमारत दुरुस्ती काम चालू असल्यामुळे प्रधानमंत्री पोषण शक्ती पारसबाग निर्मिती करण्यात आली नाही आपल्या माहिती करीता सादर

अ(२)(३) आपल्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण हा उपक्रम राबविण्यात येत आहे सदर उपक्रम मध्ये सोमवार ते शनिवार पर्यांत मेनू प्रमाणे विद्यार्थ्यांना महिला मंडळ व्दारे पोषण आहार पुरविणे जाते सदर साक्ष मेनू प्रमाणे आहे की नाही या बाबत शिक्षक स्वता चव घेऊन विद्यार्थ्यांना मदतनीस व्दारे वाटप करण्यात येते हा उपक्रम राबविण्यात आले सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

अ(२)(४) आपल्या शाळेत मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात आले या उपक्रमात शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी माती हातात घेऊन लिंकभरले विद्यार्थ्यांना मातीचा महत्त्व बाबत मार्गदर्शन केले हा उपक्रम राबवताना विद्यार्थी पालक शिक्षक उस्ताहान सहभाग घेतले सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

अ(२)(५) आपल्या शाळेत पैशाची योग्य विनियोग व व्यवस्थान होण्यासाठी विद्यार्थ्यांना बांका बाबत माहिती दिली चेकबुक पासबुक डी डी एटी एम जमा खर्च या विषयावर चर्चा करण्यात आले प्रत्येक विद्यार्थी प्रतक्ष सर्व बाबी निरिक्षण स्वता केली पैशाची महत्त्व व्यक्त केले आपल्या माहिती करीता सदर उपक्रम सहभाग विद्यार्थी फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

अ(२)(६) आपल्या शाळेत नवभारत साक्षरता अभियान हा उपक्रम राबविण्यात आले यामध्ये शिक्षक परीसरात गऋहभट देउन साक्षर निरक्षर नमुना भरून मुख्याध्यापकना दिली मुख्याध्यापक शाळेच्या माहिती सी आर सी प्रमुख कडे जमा केले आशा प्रकारे नवभारत साक्षरता उपक्रम राबविण्यात आले या बाबत कार्यशाळेतला सहभाग घेतला उपक्रम फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

 अ(३)(१) आपल्या शाळेतील विद्यार्थीचे उपस्थिती प्रमाण चांगले आहे उपस्थिती वाढविण्यासाठी शनिवार गोष्टी गायन हा उपक्रम राबविण्यात येत आहे विद्यार्थी हा उपक्रम मध्ये स्वता सहभागी होतात आणि मुखामार हा उपक्रम सुद्धा घेण्यात येते शाळेच्या उपस्थित बाबत मासिक पत्रिकेचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

अ(३)(२) आपल्या शाळेत वाचन दिन साजरा करण्यात येत आहे तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून विद्यार्थ्यांना ग्रंथालय  वाचन करण्यासाठी दिली जाते व नोंद ठेवण्यात आले आहे या उपक्रमात शाळेतील सर्व इयत्ता मधील विद्यार्थी सहभागी होतात शाळेत वाचन दिनाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

अ(३)(३) आपल्या शाळेत विद्यार्थी साठी विविध शैक्षणिक स्पर्धा घेण्यात आली या मध्ये वकृत्व स्पर्धा मध्ये सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र व ट्राफी मिळाली तसेच शाळेत निबंध स्पर्धा विभाग स्तरावर सहभागी झाले विद्यार्थी सन्मानीय महापौर चित्रकला स्पर्धेत सहभाग होउन प्रमाणपत्र मिळालेले आहे या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

अ(३)(४) आपल्या शाळेत स्काऊट गाईड उपक्रम राबविण्यात येत आहे या मध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतात दिलेले उपक्रम पूर्ण करतात स्वतंत्र दिन वेळी सहभागी होतात असे प्रकारे आपल्या शाळेत स्काऊट गाईड उपक्रम राबविण्यात येत आहे सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

             ब विभाग                                                        …..          

ब (१)(१) आपल्या शाळेत  विद्यार्थी व शिक्षक  यांच्या आरोग्य तपासणी मनपा वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले  शाळेतील सर्व इयत्ता मधील विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी आजारी बाबत पालकना सुचेना दिली वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली अहवाल  यांची अहवाल फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

ब  (१)(२) आपल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या आरोग्य योजनेची लाभ होण्यासाठी शाळेत प्रथमोपचार पेटी उपलब्ध आहे अवश्य पडताना त्याचा उपयोग केला जातो त्या मध्ये अवश्यक साहित्य उपलब्ध आहे प्रथमोपचार पेटी उपलब्ध बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

ब  (१)(३) आपल्या शाळेत बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात होऊ लागलेल्या लठ्ठपणा मधुमेह डोळ्याचे आजार या  वर मार्गदर्शन करण्यात आले या आजार कारण त्या वरील उपाय लक्षात याबाबतची व्हिडिओ दाखविले चर्चा करण्यात आली डोळ्याचे महत्त्व या वर निबंध स्पर्धा घेण्यात आली या मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

ब  (१)(४) आपल्या शाळेत किशोर वयातील विद्यार्थी साठी मासिक पाळी व्यवस्थान या बाबत समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले  या मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले महिला शिक्षिका या बाबत मार्गदर्शन केले विद्यार्थी सोबत मुक्त चर्चा करण्यात आली  या परिस्थितीत काय करावे काय करू नये या बाबत मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमात सहभागी होऊन चर्चा केली या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सदर करण्यात येत आहे

ब  (१)(५) आपल्या शाळेत स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छ हाथ घुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व सर्व विद्यार्थी कडून करुन घेण्यात आले हाथ स्वच्छ घुण्याचे फायदा या बाबत मार्गदर्शन केले विद्यार्थी कडून नाटक करून घेतले स्वच्छता महत्त्व या वर निबंध स्पर्धा घेण्यात आली या मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले या उपक्रम बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

ब  (२)(१) आपल्या शाळेत विद्यार्थी मध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रूजविण्यसाठी पैशाची गुंतवणूक बँकेच्या व्यवहार कर्ज आर्थिक व्यवहार यु पी आय या बाबत मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते या उपक्रमात बँक मॅनेजर काम बाबत माहिती दिली पासबुक चेकबुक एक टी एम या बाबत मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थी कडून करुन घेण्यात आले प्रत्येक विद्यार्थी सहभागी झाले प्रत्येक विद्यार्थी पैशा मोजून एकूण रक्कम सांगितले अशी प्रकारे आपल्या शाळेत उपक्रम राबविण्यात आले या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

ब  (२)(२) आपल्या शाळेत विद्यार्थी स्वयं रोजगार व्यवसाय व्यापार उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करीयर घडविण्यासाठी विशिस्ष कौशल्यावर शिक्षणाचे महत्त्व या वर मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांना व्हिडिओ दाखविले व या वर चर्चा करण्यात आली आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे


ब (३)(१) आपल्या शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध आहे या मध्ये डिजिटल टीव्ही  प्रएजक्टर संगणक प्रिंटर फलक आहे विद्यार्थी अध्ययनात उपयोग साठी भाष पेटी गणित पेटी इंग्रजी पेटी विज्ञान पेटी  खेळाचे साहित्य उपलब्ध आहे याचा नियमित वापर करण्यात येत आहे विद्यार्थी हा उपक्रमात सहभागी होऊन आपल्या माहिती सांगतात  आपल्या शाळा इमारत मध्ये भरत आहे भौतिक सुविधा उपलब्ध आहे या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

ब (३)(२) आपल्या शाळेत प्रत्येक महिन्याला शाळा व्यवस्थापन समिती सभा घेण्यात येते या मध्ये शाळेतील विद्यार्थी विषय व प्रशासन विषयावर चर्चा करण्यात येत आहे याचा नियमित नोंद ठेवण्यात आली आहे आपल्या माहिती करीता सादर उपक्रम फोटो सादर करण्यात येत आहे

ब (४)(१) आपल्या शाळेत तंबाखू मुक्त शाळा असे घोषित करण्यात आले आहे तसेच शाळेपासून किमान 200 मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी बंदी आहे या बाबत फलक लेखन शाळेचे गेट समोर भिंतीवर लेखन करण्यात आले आहे आपल्या शाळेत स्वच्छता अभियान अंतर्गत तंबाखू गुटखा सेवनामुळे होणारे परिणाम बाबत चर्चा करण्यात येत आहे सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

ब (४)(२) आपल्या शाळा प्यास्टीक मुक्त शाळा असे घोषित करण्यात आले आपल्या शाळेत परिसरात प्यास्टीक वापर करु नये या बाबत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले स्वच्छता अभियान अंतर्गत प्रभातफेरी वेळी प्यास्टीक मुक्त या वर घोषणा करण्यात आली या उपक्रमात सहभागी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक होते सदर उपक्रम राबविण्यात आले या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

ब (४)(३) आपल्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शिल्लक अन्नावर योग्य प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जात आहे विद्यार्थी हा उपक्रमात सहभागी होऊन आपल्या माहिती सांगतात व दिलेल्या सूचनांचे पालन करतात सदर उपक्रम राबविण्यात आले या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

ब (४)(१) आपल्या शाळेत स्वच्छता अभियान   हा उपक्रम राबविण्यात आले या मध्ये शाळेतील  सर्व विद्यार्थी सहभागी होऊन हाथ धुण्यासाठी साबण डएटआल वापर करून हाथ दुणयचे प्रात्यक्षिक करून दाखविले इतर विद्यार्थी निरीक्षण करून कृती केली तसेच स्वच्छता आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली चित्रकला स्पर्धा घेण्यात आली अशी प्रकारे स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे

ब  (५)(१) आपल्या शाळेत विद्यार्थीना आपल्या देशातील कोणत्याही एक राज्या निवडण त्या राज्याचेसंस्कृतिक वारसा देश उभारणीसाठी राज्याचे योगदान या उपक्रमात ओडिसा राज्याचे माहिती दिली या मध्ये ओडिसा राज्याचे वेशभूषा सण भाषा आहार या बाबत चर्चा करण्यात आली विद्यार्थी ऐकून प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतली ओडिसा राज्याचे ओळख वर प्रश्न मंजुष स्पर्धा घेण्यात आली उपक्रम फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहेत

ब  (६)(१) आपल्या शाळेत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आली या मध्ये धावणं फुटबॉल लंगडी रस्सीखेच रस्सईउडइ हीस स्पर्धा घेण्यात आली या मध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले चांगली विद्यार्थी निवड करुन कौतुक करण्यात आले विद्यार्थ्यांना खेळाचे नियम सांगितले विविध स्पर्धा सहभागी घेण्यात मार्गदर्शन केले खेळाचे महत्त्व या वर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली सदर उपक्रम राबविण्यात आला आहे या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे

ब (५)(१) आपल्या शाळेत विद्यार्थी केंद्रीत उपक्रम राबविण्यात आले येत आहे व शाळा व्यवस्थापन समिती सभा घेण्यात येत आहे त्यांची नोंद ठेवण्यात आले आहे शाळेत अवश्य पडताना माजी विद्यार्थी व पालक स्थानिक लोक यांच्या सहभाग घेण्यात येत आहे शाळेत प्रत्येक वर्गातील विद्यार्थी सहभागी प्रत्येक उपक्रम मध्ये घेण्यात येत आहे पट वाढ करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती मदत घेण्यात येत आहे  अश प्रकारे आपल्या शाळेत विद्यार्थी पालक स्थानिक पातळीवर लोकांचे   सहभाग घेण्यात येत आहे आपल्या माहिती करीता सदर माहिती सादर करण्यात येत आहे


व्हॉट अप आभार

Monday, 24 July 2023

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती

 🏡 ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती ----


➡कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


➡लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :

600 ते 1500 - 7 सभासद

1501 ते 3000 - 9 सभासद

3001 ते 4500 - 11 सभासद

4501 ते 6000 - 13 सभासद

6001 ते 7500 - 15 सभासद

7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद


➡निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


➡कार्यकाल - 5 वर्ष


➡विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.


➡आरक्षण :

👉महिलांना - 50%

👉अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

👉इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)


➡ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :

👉तो भारताचा नागरिक असावा.

👉त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

👉त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.


➡ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.


➡सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.


➡सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.


➡राजीनामा :

👉सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

👉उपसरपंच - सरपंचाकडे


➡निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :

सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.


➡अविश्वासाचा ठराव :

👉सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.


👉बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)


👉अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच


👉तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.


👉अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.


👉आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.


➡ग्रामसेवक / सचिव :

निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी.

नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी.

कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा.


➡कामे :

👉ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

👉ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.

👉कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

👉ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

👉व्हिलेज फंड सांभाळणे.

👉ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

👉ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

👉गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

👉जन्म-मृत्यूची नोंद करणे.


➡ग्रामपंचातीची कामे व विषय :

कृषी

समाज कल्याण

जलसिंचन

ग्राम संरक्षण

इमारत व दळणवळण

सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

सामान्य प्रशासन


👉ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.


👉बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)


👉सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.


👉अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच


👉ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

___________________________________


✳✴ग्रामपंचायतींची कार्ये✴✴


१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.


२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.


३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.


४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.


५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.


६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.


७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.


८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे .

___________________________________


✔आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.


* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.


* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.


* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.


* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.


* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद

वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.


* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.


अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत    शकते असे वाटते.यात सहभागी होवा आपला गाव आपला विकास

- नरेंद्र चौधरी, संपादक - सायंदैनिक राजरंग टाइम्स,  दैनिक लोकमैत्री, साप्ताहिक सखी मंच

Tuesday, 18 July 2023

हिरवे सागरी शैवाल

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 हिरवे सागरी शैवाल


हिरवे सागरी शैवाल जगातील समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय महासागरात किनाऱ्यालगत आधाराला चिकटून वाढते, म्हणून खडकाळ सागरी क्षेत्रात ते आढळते. काही हिरवे सागरी शैवाल कमी प्रमाणात क्षार असलेल्या पाण्यातही वाढू शकतात. उदाहरणार्थ, नदी-सागर संगमक्षेत्र. हिरवे सागरी शैवाल द्राक्षासारखे, तंतू स्वरूपात, पक्ष्यांच्या पिसासारखे आणि पालेभाजीसदृश अशा विविध आकारांत आणि स्वरूपांत आढळते. हिरवे शैवाल रुचकर असल्याने सागरातील मत्स्यवर्गीय प्राण्यांचे आवडीचे खाद्य ठरते. यातील भरपूर ‘क’ जीवनसत्त्व आणि १०० टक्के पचण्यायोग्य पदार्थामुळे सागरातील शाकाहारी प्राण्यांसाठी ही जणू मेजवानीच. या शैवालाला निसर्गदत्त लाभलेला ‘गार्लिक ऑईल’ गंध त्यांना अनेक सूक्ष्म आदिजीवांद्वारे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण प्रदान करतो.


ओहोटीच्या वेळी जेव्हा पाणी मोठय़ा प्रमाणात ओसरते, तेव्हा शैवाल अभ्यासण्याची योग्य वेळ असते. उल्वा, कॉलरपा, एंटेरोमार्फा, ब्रायोपसीय, उडोथीया या काही हिरव्या सागरी शैवालांच्या प्रजाती आहेत. या शैवालाचा उपयोग औषधांत अँटिकॅन्सर, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट म्हणून होतो. हल्लीच झालेल्या संशोधनानुसार काहींमध्ये अँटिव्हायरल सक्रियता दिसून आली आहे. याचा उपयोग कोविडसारख्या साथींवर उपाय म्हणून होऊ शकतो का, याविषयी संशोधन सुरू आहे. ‘कॉलरपीन’ नावाच्या अल्कलॉईडमध्ये अशी क्षमता दिसून आली आहे. ‘डायक्लोरमिथेन मिथेनॉल’ हा अर्क उडोथिया या हिरव्या शैवालाच्या दोन प्रजातींपासून मिळवला जातो. त्याच प्रमाणे कॉलरपा टॅक्सीफोलिया आणि एंटेरोमार्फा कांप्रेसा या शैवालांतही कर्करोग प्रतिरोधक गुणधर्म आढळतात. एंटेरोमार्फापासून ‘औनोरी’ आणि उल्वापासून ‘अओसा’ नावाचे खाद्यपदार्थ तयार केले जातात. कोडियम हे शैवाल सी-स्लग्जचे आवडते खाद्य आहे.


महासागरात हरित सागरी शैवालाचे प्राबल्य सागरी परिसंस्थेत शक्तिशाली अन्नसाखळी निर्माण करून महत्त्वाची भूमिका बजावते. काही हरित शैवाल, उदाहरणार्थ सूक्ष्म एकपेशीय शैवाल यांचा बहर प्राण्यांना आणि माणसालाही तापदायक ठरू शकतो. या शैवालांची प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यास पाण्याला दुर्गंध येतो आणि खोल पाण्यात प्रकाश पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. ऑक्सिजनची पातळी कमी होऊन विषारी वायू वाढल्याने समुद्रातील खाद्यप्राण्यांना दुर्गंध येतो. या सर्वासाठी प्रदूषण कारणीभूत ठरते. म्हणून सागरात सांडपाणी सोडताना या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.


🖊 डॉ. चंद्रकांत लट्टू

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १८ जुलै २०२३

==============

उपयुक्त सागरी शैवाल

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 उपयुक्त सागरी शैवाल


सागरातील परिसंस्थेत आढळणाऱ्या विविध प्रकारच्या शैवालांना ‘सी-वीड’ या नावाने ओळखले जाते. यात वीड हा शब्द आला असला तरी हे वनस्पतीतील सामान्य तण नसून त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही सागरी शैवाल सूक्ष्म एकपेशीय तर काही  विशाल आकाराचे बहुपेशीय असतात. बहुधा सागरी शैवाल सागराच्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रात दृढ आधाराला चिकटून असलेले आढळतात. खडकाळ सागर किनाऱ्यांवर त्यांचे अधिक वास्तव्य असते. भारताच्या  संपूर्ण सागरी किनाऱ्यावर शैवालांच्या एकूण ८०० जाती आढळतात. त्यांचे वास्तव्य खोल सागरात क्वचितच आढळते.  सागरी शैवालांचे वर्गीकरण रंगानुसार तीन गटांत करतात, क्लोरोफील हरितद्रव्य  असणारे हिरवे शैवाल, झ्ॉन्थोफीलधारी तपकिरी शैवाल आणि फायकोइरीथ्रीनयुक्त लाल शैवाल. ओहोटीच्या सुमारास खडकाळ सागरी किनाऱ्यांवर भटकंती केल्यास विविध प्रकारचे शैवाल पाहायला मिळते, तसेच तेथील खोलगट डबक्यांतही (कोस्टल पूल्स) दिसून येतात.


सागरी शैवाल हा अनंतकाळ उपलब्ध असणारा, व्यावसायिक महत्त्वाचा एक जिवंत अन्नस्रोत असतो. सर्व सागरी शैवाल हे स्वयंपोषी, जलद वाढणारे, सागराच्या भरती-ओहोटी क्षेत्रात आढळणारे, वाढीसाठी वेगळी जमीन न लागणारे स्रोत आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती न आल्यास हा अक्षय साठा उपलब्ध असतो. सागरी शैवालांची  वाढ जमिनीवरील वनस्पतींपेक्षा अनेक पटींने अधिक असते. सागरी शैवाल मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असूनही, त्याला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन अधिक सोयीस्कर उपलब्धतेसाठी मानवाने त्यांची  शेती करण्याचे तंत्रज्ञान फार पूर्वीपासून आत्मसात केले. आता हा जागतिक उद्योग झाला आहे, कारण यांचा उपयोग प्राण्यांच्या खाद्याव्यतिरिक्त मानवासाठीही करता येतो. या व्यवसायात जपान, दक्षिण कोरिया आणि चीन हे देश आघाडीवर आहेत. सध्या सागरी शैवालांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ पाश्चात्त्य देशांमध्ये पण आवडीचे होत आहेत.


समुद्र शैवाल हरितद्रव्याच्या साहाय्याने मोठय़ा प्रमाणात प्राणवायू तयार करतात तसेच हानिकारक कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि जीवसृष्टीला उपयोगी असल्याचे सिद्ध करतात. शिवाय समुद्रातील जीवांना आश्रय व अन्न देतात. काही सागरी शैवाले औषध, खते, सौंदर्यप्रसाधने यांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. काही सागरी शैवालांमधील चिकट स्वरूपाच्या रसायनांचा वापर स्थिरीकरण करणारे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.


🖊 डॉ. चंद्रकांत लट्टू

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १७ जुलै २०२३

==============

शार्क जाणीव-जागृती दिवस

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 शार्क जाणीव-जागृती दिवस


१४ जुलै हा दिवस जगभर शार्क जाणीव-जागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. शार्कसाठी असा दिवस साजरा करण्याची गरज काय, असा प्रश्न पडू शकतो. काही चित्रपट आणि कादंबऱ्यांमध्ये दाखवलेली शार्कच्या माणसांवरील हल्ल्याची दृश्ये भयानक असतात. निसर्गात ४२ कोटी वर्षांपूर्वी म्हणजे झाडांच्याही आधी अस्तित्वात येऊन अजूनही टिकलेल्या शार्कना लोक काल्पनिक भीतीपोटी हिंस्र व आक्रमक समजून संपवत आहेत.


शार्कना वाचवायची गरज आणि वाघांना वाचवायची गरज याची कारणमीमांसा एकसारखी आहे. एखाद्या भूप्रदेशातील वाघ नष्ट झाले तर वाघांचे भक्ष्य असणाऱ्या हरिणांसारख्या प्राण्यांची संख्या खूप वाढेल. हरिणे रानातील गवत फस्त करतील. ते मिळेनासे  झाले की शेतांकडे, बागांकडे वळतील. भाजीपाला, कंद, फळे खातील. माणसांची उपासमार होईल. एखाद्या समुद्री भागातील सर्व शार्क नाहीसे झाले तर शार्कचे नैसर्गिक भक्ष्य असणाऱ्या माशांची, कासवांची संख्या अतोनात वाढेल. असे  मासे, कासवे ज्यांना खातात त्या प्रकारचे मासे, शेवाळ कमी होत जाईल. मग मासे, कासवे त्यांचे नेहमीचे खाद्य नसणारे जीव खाऊ लागतील. विविध प्रकारची शैवाल नष्ट होऊन ऑक्सिजन निर्मितीही घटेल. किंवा शैवालसंख्येचा प्रस्फोट होऊन पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होईल. अन्नसाखळय़ांचा, अन्नमनोऱ्यांचा, पाण्यात विरघळलेल्या वायूंचा नैसर्गिक समतोल बिघडेल.       


वस्तुस्थिती संपर्कमाध्यमांतून निर्माण करण्यात आलेल्या शार्कच्या प्रतिमेच्या उलट आहे. प्रत्यक्षात टायगर शार्क, बुल शार्क आणि क्वचित ग्रेट व्हाइट असे बाराशेपैकी तीनच प्रकारचे शार्क, माणसांवर काही वेळा हल्ले करतात. शार्कना माणूस अन्न म्हणून आवडत नाही. त्यांना भरपूर चरबीयुक्त प्राणी खायला आवडत असल्याने माणसांपेक्षा सील्स, व्हेल्स, डॉल्फिन्स-सारखे गुबगुबीत प्राणी खाणे पसंत करतात.  


माणसे स्वार्थासाठी इतके शार्क मारत आहेत की शार्कच्या काही जाती नष्टप्राय झाल्या आहेत. परांपासून सूप तयार करण्यासाठी, कातडीसाठी, पाळीव कुत्र्या-मांजरांच्या आणि माणसांच्या खाद्याठीही शार्क (मोरी किंवा मुशी) मारले जातात. शार्कपासून कर्करोगरोधक औषध मिळते, हा गैरसमज असला तरी बाजारात तथाकथित शार्कजन्य कर्करोगरोधक औषधे येतात. ती मिळवण्यासाठी दरमहा दोन लाख शार्कची कत्तल फक्त उत्तर अमेरिकेत होते.


अशी अमेरिकेसारख्या प्रगत, समृद्ध देशाची स्थिती आहे, यावरून शार्क जाणीव-जागृती दिवस साजरा का करावा हे स्पष्ट होते.


🖊 नारायण वाडदेकर

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १४ जुलै २०२३

==============

वनस्पतिप्लवकातील विशेष गुणधर्म

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 वनस्पतिप्लवकातील विशेष गुणधर्म


करंडक (डायाटम) प्लवकाची पेशी डबीसारखी असते. या प्रजातीत अलैंगिक प्रजनन होते. प्रत्येक प्रजननानंतर पेशी लहान होत जाते. करंडक सजीव डायाटमची जीवाश्मे मिळत नाहीत. पेशीत असलेल्या सिलिकाचे विघटन होत नसल्याने ते अनेक थरांमध्ये करंडकीय मृदेच्या स्वरूपात महासागराच्या तळाशी जमा होतात. करंडक सजीवाचे अनेक उपयोग आहेत. पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी, औषधांमध्ये आणि रंगांमध्येही हे सजीव वापरले जातात.


करंडक सजीव जैवसूचक असल्याचे आढळले आहे. पाण्यातील पोषक घटक वाढले की यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होऊन ‘अल्गल ब्लूम’ निर्माण होतात. त्यांच्यातील जैविक विष पाण्यात उतरते आणि सागरातील जलचर आणि ते जलचर खाणाऱ्यांना विषबाधेचा त्रास होतो. करंडक सजीवांची संख्या अधिक वाढल्याने त्यांचाही मृत्यू होतो. ते सर्व सागराच्या तळाशी जातात. तेथे विघटन करणाऱ्या जिवाणूंची क्रिया सुरू होते त्यामुळे येथील ऑक्सिजनचे प्रमाण घटते. त्या भागातील प्राणी ऑक्सिजनअभावी गुदमरून मरतात आणि त्या भागात एक मृत म्हणजे वठलेला पट्टा तयार होतो.


करंडक सजीव आणि प्रवाळांमध्ये सहजीवन दिसून येते. प्रवाळ बेटांमध्ये यांचे प्रमाण अधिक असते. १० टक्क्यांहून करंडक सजीव कोष करून राहतात. वातावरण प्रतिकूल असेल तर अनुकूल परिस्थिती येईपर्यंत ते सुप्तावस्थेत राहू शकतात. या स्थितीतच ते उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात प्रिकॅम्ब्रियन युगात डायनोफ्लॅजेलेट कोष रूपात असल्याची नोंद आहे.


काही ठिकाणी रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये चकचकीत उजेड दिसून येतो ज्यास ‘जीवदीप्ती’ म्हणतात. निळा हिरवा प्रकाश देणाऱ्या जीवदीप्ती असलेल्या द्विकाशाभिक सजीवांच्या सुमारे १८ प्रजाती आहेत, उदा. नॉकटील्यूका. काही यांत्रिक कारणांमुळे जसे की बोट चालवणे, पोहणे किंवा लाटांमुळे उत्तेजित झाल्यामुळे ०.१ सेकंद निळा प्रकाश चमकून जातो. पाण्यात हे द्विकाशाभिक असंख्य असल्यामुळे हा प्रकाश खुलून दिसतो. या एकपेशीय सजीवांमध्ये ल्युसिफेरीन नावाचा जैवरेणू असतो ज्याच्यामुळे ‘जीवदीप्ती’ ही अद्भुत भासणारी घटना पाहायला मिळते. ल्युसिफेरीनची ऑक्सिजनबरोबर रासायनिक क्रिया होऊन रासायनिक ऊर्जेचे प्रारणऊर्जेत रूपांतर होते आणि आपल्याला उजेड दिसतो. आपल्याकडे अंदमानला तसेच प्युएटरे रिको, फ्लोरिडा या ठिकाणी सागरात अशी जीवदीप्ती दिसून येते.


 🖊डॉ. मंगला बोरकर

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १३ जुलै २०२३

==============

डायाटम व डायनोफ्लॅजेलेट

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 डायाटम व डायनोफ्लॅजेलेट


सूक्ष्मशैवालांची दुनिया खूपच न्यारी आहे. चमकणाऱ्या सूक्ष्मशैवालांमध्ये प्रामुख्याने करंडक सजीव (डायाटम) आढळतात. हे काचेच्या घरात राहतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पृथ्वीवरील या सजीवाच्या पेशी भित्तिकेमध्ये सिलिका असते. या भित्तिका पारदर्शक असतात. त्यांच्यामध्ये अनेकविध एकाहून एक सुंदर असे नक्षीकाम असते. म्हणूनच त्यांना सागरातील रत्ने असे म्हणतात. त्यांची संख्या २० हजार ते २ लक्ष इतकी आहे आणि शास्त्रज्ञांना दरवर्षी नवीन प्रजातींचा शोध लागतो. ते ज्या पाण्यात राहतात त्या पाण्याच्या गुणधर्मावर आणि आजूबाजूच्या इतर घटकांवरही करंडक सजीवांची वाढ अवलंबून असते.


पाण्यातील पोषक घटकांचे प्रमाण, पाण्यात तरंगणारे घनकण, पाण्याचा गढूळपणा, प्रवाहाची दिशा, त्यातील चढ-उतार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी हस्तक्षेप. यामुळेच डायाटम हे पाण्यातील जैविक परिस्थितीचे मूल्यमापन आणि निरीक्षण करण्यास खूप उपयुक्त ठरतात. हे स्वयंपोषी सजीव आहेत. पाण्यातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे महत्त्वाचे काम हे सजीव बजावतात. करंडक सजीवामध्ये आकार विविधता आहे. काही वर्तुळाकार, काही लंबगोल, काही आयताकृती, काही त्रिकोणी, काही बाणाचे टोक असल्यासारखे, काही एकटेच असणारे तर काही लांब साखळी करून असणारे. उदाहरणार्थ, कॉक्सिनोडिस्कस, नॅव्हीक्युला, पिन्नुलॅरिया इत्यादी.


सागरात प्रामुख्याने अधिवास असणारे दुसरे सूक्ष्मशैवाल म्हणजे ‘द्विकशाभिक’ (डायनोफ्लॅजेलेट). हे नाव ग्रीक भाषेतील डायनो म्हणजे दोन द्वी आणि लॅटिन भाषेतील फ्लॅजेलेट कशाभिका असलेले. त्यांचा आकार चाबकासारखा दिसतो. या एकपेशीय सजीवाला दोन कशाभिका असतात. आतापर्यंत या प्रकारच्या सुमारे २००० प्रजातींची नोंद झाली आहे, त्यात सुमारे १७०० च्या वर सागरी परिसंस्थेतील आहेत. या पेशींना बाहेरच्या बाजूला अँफीएस्मा नावाचे सेल्युलोजचे बनलेले कवच असते. वेगवेगळय़ा पेशींमध्ये याची रचना विशेष असते. बरेचसे द्विकाशाभिक स्वयंपोषी असले तरी काही मिश्रपोषित तर काही परजीवी आहेत. यांच्यामधील हरितद्रव्य क्लोरोफिल अ आणि क प्रामुख्याने असले तरी झँन्थोफिल या रंगद्रव्य गटातील पेरिडीनिन, डायोझँनथिन आणि डायडिनोझानथिन हेही प्रामुख्याने असल्यामुळे त्यांचा रंग सोनेरी तपकिरी असतो. या एकपेशीय सजीवांमध्ये पुनरुत्पादन अिलगी असते. उदा. जिम्नोडीनियम, सेरॅशिअम, लिंगूलोडीनियम इत्यादी प्रजाती सागरी जीवांना अन्न पुरवण्याचे महत्त्वाचे काम करतात.


🖊 डॉ. मंगला बोरकर

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १२ जुलै २०२३

==============

वनस्पतिप्लवक

🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 वनस्पतिप्लवक


सूक्ष्मशैवालाचे सर्वसाधारण उदाहरण म्हणजे प्लवक. हे खूप वैविध्यपूर्ण असतात. प्रकाशसंश्लेषण करणाऱ्या जिवाणूंपासून ते डायाटम, हरित शैवालांच्या गटातील केवळ सागरात आढळणारे, कॅल्शिअम कार्बोनेटचे कवच धारण करणारे कोकोलिथोफोर, या सगळय़ा प्लवकांमध्ये प्रकाशसंश्लेषणासाठी लागणाऱ्या प्रकाशकिरणांतील वेगवेगळय़ा लहरींचा उपयोग केला जातो. पेशींच्या वेगवेगळय़ा रचनेमुळे आणि पेशी भित्तीकेतील विविध प्रथिन संयुगांमुळे जांभळय़ा लहरी (४४० नॅनोमीटर) ते लाल लहरी (६७५ नॅनोमीटर) शोषून घेतल्या जातात. प्लवकांमध्ये खूप विषमता असतातच आणि त्यामुळेच विविध क्षमताही असतात.


सूक्ष्मशैवाल हे तीन प्रकारे वाढू शकतात- स्वयंपोषित, विषमपोषित आणि मिश्रपोषित. सूर्याची ऊर्जा वापरून स्वत:चे अन्न तयार करणारे स्वयंपोषित. कार्बनी संयुग वापरून ऊर्जा मिळवणारे विषमपोषित. मिश्रपोषित हे दोन्ही म्हणजेच स्वयंपोषित आणि विषमपोषित प्रकारची वैशिष्टय़े प्रकार दर्शवतात. विषमपोषित आणि मिश्रपोषित, हे दोन प्रकार उपयुक्त ठरतात. कारण खोल पाण्यात तसेच पाण्यातील प्रदूषण, घनता आणि इतरही काही अडथळे आल्यामुळे सूर्यप्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही तरीही ते आपली ऊर्जा निर्मिती करून अन्न मिळवण्याचा कार्यभाग पूर्ण करू शकतात. या सर्व सूक्ष्मशैवालांना वाढीसाठी वेगवेगळय़ा प्रमाणात लागणारे पोषक घटक म्हणजे नायट्रेट, फॉस्फेट, सिलिकेट आणि कॅल्शिअम हे आहेत. त्यांचे प्रमाण ठरावीक प्रजातींवर अवलंबून असते. काही प्लवक हवेतील नत्राचा संचयित वापर करून नत्रयुक्त घटक तयार करू शकतात आणि त्यामुळेच कमी नत्र असलेल्या वातावरणात राहू शकतात. सर्व सूक्ष्मशैवालांना कमी प्रमाणात का होईना पण लोहाची गरज असते. सागरी पाण्यात लोहाचे प्रमाण त्या मानाने कमी असते. त्यामुळेही शैवालांचे वितरण थोडे विस्कळीत होते. लोह असलेल्या ठिकाणीच ते वाढू शकतात. याशिवाय ‘ब’ जीवनसत्त्वाचीसुद्धा त्यांना गरज असते. या घटकांबरोबर पाण्याचे तापमान, क्षारता, खोली तसेच त्यांच्यावर अवलंबून असणारे प्राणी, यांच्यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून असते.


घरगुती आणि उद्योगधंद्यांमधील सांडपाणी मोठय़ा प्रमाणावर सागरात गेल्यामुळे प्लवकांना पोषकद्रव्ये जास्त प्रमाणात मिळतात आणि त्यांची वाढ प्रचंड होते, यालाच ‘अल्गल ब्लूम’ असे म्हणतात. अतिपोषक द्रव्ये मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाल्याने इतर प्रजातींची हानी होऊ शकते.


🖊 डॉ. मंगला बोरकर

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- ११ जुलै २०२३

==============

समुद्रातील सूक्ष्मशैवाल

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 समुद्रातील सूक्ष्मशैवाल



समुद्रकिनारी उभे राहून लाटांची ये-जा पाहताना आपल्या नजरेला दिसते ते केवळ पाणी; परंतु याच पाण्याचा थेंब जर सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून पाहिला तर त्यात एकपेशीय सजीव तरंगताना दिसतात. त्यांचे वर्गीकरण दोन विभागांत केले जाते. एक ‘दृश्यकेंद्रकी’ ज्यात आनुवंशिक द्रव्य डीएनए हे गुणसूत्रांमध्ये असून केंद्रकामध्ये बंदिस्त असते, तर दुसरा विभाग ‘आदिकेंद्रकी’ ज्यामध्ये स्पष्ट केंद्रक नसते. त्यांचा डीएनए पेशींमध्ये विखुरलेला असतो. त्यांना नीलहरित शैवाल अथवा प्रकाशसंश्लेषण करणारे जिवाणू (सायनोबॅक्टेरिया) म्हटले जाते. अशा सुमारे २५ हजार सूक्ष्मशैवाल प्रजातींची ओळख पटली आहे. प्रकाशसंश्लेषण करणारे हे सर्वात प्राचीन सजीव आहेत.


पाण्याचे तापमान, क्षारता व पोषक घटक यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून असते. ते पाण्यात व पाण्याच्या पृष्ठभागावरील थरात तरंगतात वा किनाऱ्यालगतच्या दलदलीत वास्तव्य करतात. वनस्पतिप्लवक (फायटोप्लँक्टन) व प्राणिप्लवक (झूप्लँक्टन) असे त्यांचे वर्गीकरण होते. प्लँक्टन हा ग्रीक भाषेतून आलेला शब्द आहे. प्लँक्टन म्हणजे भटके, तरंगणारे म्हणजेच पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणारे. त्यांच्यात स्वत:हून पोहोण्याची क्षमता नसते. हे जीव एकटे किंवा तंतूसाखळी स्वरूपात किंवा गटात असतात. त्यांचे आकारमान त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असते. ते काही मायक्रोमीटर ते काही शेकडो मायक्रोमीटरचे असतात. त्यांच्यात अनेक अनुकूलने दिसतात.


जलीय परिसंस्थेतील त्यांची संख्या प्रचंड असते. वनस्पतिप्लवक आपली ऊर्जा प्रकाशसंश्लेषणाने मिळवतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. प्राणिप्लवक व इतर जलचर ऊर्जेसाठी या सूक्ष्मशैवालांवर अवलंबून असतात. त्यांना परपोषी म्हणतात. ते जलीय अन्नसाखळीतील प्रथम उत्पादक आहेत आणि इतर जलचरांचे भक्ष्य आहेत. पाण्यातील बहुतांश अन्नसाखळय़ा या सूक्ष्मशैवालांवर अवलंबून असतात. सूर्याची ऊर्जा ग्रहण करून जलीय जीवसृष्टीला जिवंत ठेवण्यात वनस्पतिप्लवक अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात.


सूक्ष्मशैवालाची दोन वैशिष्टय़े म्हणजे त्यांचा प्रजनन काळ कमी असतो, त्यामुळे त्यांची संख्या त्वरेने वाढते. अनुकूल वातावरणात ते हरितद्रव्याच्या साहाय्याने (क्लोरोफिल, फायकोबिलिन) प्रकाशसंश्लेषण करू शकतात. वातावरणातील हरितगृह वायू कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण घटवणारे हे महत्त्वाचे नैसर्गिक शिलेदार आहेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पृथ्वीवरील ५० टक्के ते ८० टक्के ऑक्सिजन वायू हा सागराकडून मिळतो.


🖊 डॉ. मंगला बोरकर

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १० जुलै २०२३

==============

Friday, 7 July 2023

मच्छीमार ते मत्स्यशास्त्रज्ञ

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 मच्छीमार ते मत्स्यशास्त्रज्ञ


‘‘माझ्या आयुष्यातील सोनेरी पान म्हणजे एक सामान्य मच्छीमार युवक मत्स्यशास्त्रज्ञ बनणे हे होय,’’ सदाशिव गोपाळ राजे यांचे हे कृतकृत्यतेचे उद्गार. राजे हे केंद्रीय समुद्री मत्स्यकीय संशोधन संस्थेतील निवृत्त मत्स्यशास्त्रज्ञ असून आजही वर्सोव्याच्या किनाऱ्यावर मत्स्य व्यवसाय करतात. वडिलांबरोबर मासेमारी करणारे राजे १९७६ मध्ये प्राणीशास्त्र व रसायनशास्त्र या विषयात पदवी मिळवल्यानंतर मोठय़ा भावाच्या आग्रहाखातर वर्सोव्यातील केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्थेच्या (सीआयएफई) आवारात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी गेले. परंतु त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.


एका मच्छीमार तरुणाला मत्स्यवैज्ञानिक होण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडले होते. राजे गप्प बसणाऱ्यांतील नव्हते. डॉ. एस. एम. द्विवेदी या त्या वेळच्या संचालकामुळे त्यांना तेथे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला. डॉ. दत्तात्रय वामन बाळ आणि डॉ. सी. व्ही. कुलकर्णी हे दोन मराठी  दिग्गज त्यावेळी सीआयएफईच्या संस्थापक सदस्यांपैकी होते. राजे यांनी सीआयएफईमध्ये मत्स्यविज्ञानाची पदविका घेतल्यानंतर त्यांची निवड प्रदर्शक/ वस्तुपाठक (डेमॉन्स्ट्रेटर) म्हणून करण्यात आली. पुढील पाच वर्षांत आपल्या अथक परिश्रमांनी आणि आपल्या मत्स्य व्यवसायातील शास्त्रीय अनुभवामुळे राजे मत्स्यवैज्ञानिक झाले. त्यांची नेमणूक कोची येथे केंद्रीय सागरी मत्स्यविज्ञान संशोधन (सीएमएफआरई) संस्थेत झाली. तेथे जवळपास ३० वर्षे वैज्ञानिक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केले. कास्थिमत्स्य प्रकारच्या माशांवर अधिकारवाणीने बोलणारे सदाशिव राजे यांचे ‘मरीन फिशरी रिसोर्स ऑफ इंडिया’ या पुस्तकातदेखील योगदान आहे. त्यांचे जवळपास ५० हून अधिक संशोधन निबंध निरनिराळय़ा मत्स्यविज्ञान संशोधन पत्रिकांत प्रसिद्ध झाले आहेत. आपल्या शास्त्रीय ज्ञानाचा स्थानिक मच्छीमार समाजाला पुरेपूर वापर व्हावा यासाठी ते नेहमीच तळमळीने कार्य करत असतात. आजदेखील निवृत्तीनंतर सीआयएफईच्या समितीवर सभासद म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. 


मच्छीमार हा महासागराभोवती निर्माण होणाऱ्या संस्कृतीचा अविभाज्य घटक ठरतो. केवळ चरितार्थासाठी महासागराकडे न पाहता त्याचा शास्त्रीय अभ्यास करणारे हे ‘मस्त्यवैज्ञानिक मच्छीमार’ त्यांच्या पत्नी जयश्री यांच्यासमवेत मच्छीमार महिलांचे अनेक व्यावसायिक प्रश्न सोडवण्यातदेखील पुढाकार घेतात.


 🖊 डॉ. नंदिनी विनय देशमुख

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- ७ जुलै २०२३

==============

सागरी वनस्पतींची ओळख

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 सागरी वनस्पतींची ओळख


सागरी वनस्पती समुद्र आणि महासागरात उगम पावतात, वास्तव्य करतात आणि वाढतात. त्या अनेक प्रकारच्या असून लाखोंच्या संख्येने समुद्रात सापडतात. उपलब्ध सूर्यप्रकाश, पाण्याची क्षारता आणि पाण्याचे तापमान यांचा परिणाम त्यांच्या कमी जास्त असण्यावर होत असतो. पृथ्वीवर असणाऱ्या ऑक्सिजनचा ५०-८० टक्के भाग सागरातून मिळतो तो या सागरी वनस्पतींमुळेच. सागरी वनस्पती काही जलीय प्राण्यांचे शत्रूपासून आणि इतर त्रासदायक घटकांपासून संरक्षण करतात व जलीय प्राण्यांना जगण्यासाठी अन्न पुरवतात. त्या प्राथमिक अन्न उत्पादक मानल्या जातात. या एकपेशीय व अनेकपेशीय असतात. सूक्ष्मशैवाल (प्लवक), करंडक सजीव (डायाटम), द्विकशाभिक (डायनोफ्लॅजेलेट्स), मोठे शैवाल (मॅक्रोअल्गी) किंवा सागरी तण (सी वीड्स), सागरी गवत (सी ग्रासेस), तिवर (खारफुटी) आणि समुद्रकिनाऱ्यांवरील काही बिजी झुडुपे आणि उंच वृक्ष अशा प्रकारच्या वनस्पतींचा यात समावेश होतो. अर्थात मुख्य भरणा आहे शैवालांचा, त्या मानाने बिजी वनस्पती अगदीच कमी आहेत.


एकपेशीय शैवाल मोठय़ा प्रमाणावर असून काही शैवाल हे पेलॅजिक क्षेत्रात वाढतात. हे क्षेत्र १००-४०० मीटर खोलपर्यंत पसरलेले आहे आणि तिथपर्यंत प्रकाश पोहोचू शकतो. काही प्लवक हे साधारणपणे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहतात तर बाकीचे खोल पाण्यात गाळाला चिकटून राहतात. मुळातच जमिनीवर असो किंवा सागरात, वनस्पतींचे अस्तित्व प्रकाशाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. या सर्व वनस्पती तीन प्रकारच्या प्रकाशीय क्षेत्रांत आढळतात- भरपूर सूर्यप्रकाश स्थिती, कमी प्रकाश स्थिती आणि प्रकाशहीन स्थिती. सागरी वनस्पती सर्व प्रकारच्या आकारांत पाहायला मिळतात आणि त्या दोन प्रकारच्या स्थितीत आढळतात. मुक्तसंचार आणि एका जागी स्थिर. प्लवकासारख्या मुक्त संचार करणाऱ्या  वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असतात तर स्थिर वनस्पती सूर्यप्रकाश जिथपर्यंत पाण्यात पोहोचू शकेल अशा जागी खोलवर आपली मूळे रोवून उभ्या असतात.


सागरी प्राण्यांना ऊर्जा व पोषक अन्नघटक पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य सागरी वनस्पती करतात. संपूर्ण सागरी जीवसाखळी तिवरांनी समृद्ध असलेल्या भागात आकाराला येत असते. तिवरांमुळे वादळांचा तडाखा सौम्य होतो. त्यामुळे समुद्री खाडीचा भाग तिवरांनी समृद्ध असणे आवश्यक आहे.


🖊 डॉ. किशोर कुलकर्णी

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- ५ जुलै २०२३

==============

बहुपयोगी अंटार्क्टिक क्रील

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 बहुपयोगी अंटार्क्टिक क्रील


अंटार्क्टिका क्रील हे कोळंबीसारखे छोटे अर्धपारदर्शक संधिपाद क्रस्टेशियन समूह आहेत. सहा सेंमी लांबीचे हे जीव पूर्ण वाढ होऊन सात वर्षांपर्यंत जगू शकतात. क्रील खूप चांगले पोहतात, पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. पाण्याच्या पृष्ठभागालगत तरंगत असल्याने त्यांना प्लवक वर्गात समाविष्ट केलेले असून ते आकाराने सर्वात मोठे प्लवक आहेत.


क्रील सामान्यत: मोठय़ा झुंडीने राहतात. एक घनमीटर पाण्यात १० हजारांपेक्षा जास्त क्रिल असू शकतात. क्रीलचे थवे अगदी लहान, काही मीटर लांब असू शकतात तसेच कधी हजार टन क्रील मैलोन्मैल पसरलेले दिसतात. क्रीलचे आवडते खाद्य म्हणजे वनस्पतिप्लवक, डायाटम नावाचे एकपेशीय शैवाल. कधी कधी त्यांच्या आहारात अगदी लहान प्राणिप्लवक आणि माशांचे डिम्भ असतात. बहुधा हे बर्फाच्या खालच्या बाजूस असलेले वनस्पतिप्लवक खातात.


अन्नसाखळीच्या तळाशी असलेल्या आधारभूत (कीस्टोन) प्रजातींत क्रीलचा समावेश होतो  कारण या प्रजाती वनस्पतिप्लवक आणि काही प्रमाणात प्राणिप्लवक खातात. दक्षिण महासागरात अंटाक्र्टिक क्रीलची युफौसिया सुपरबा ही प्रजात शेकडो दशलक्ष टन जैववस्तुमान निर्माण करते. यापैकी अर्ध्याहून अधिक जैववस्तुमानामुळे प्रतिवर्षी व्हेल, सील, पेंग्विन, नळ-माकूळ आणि मासे यांचे पोषण होते. या प्राण्यांची वाढ आणि पुनरुत्पादन होऊन परत अधिक जैववस्तुमान तयार होते. यातील वनस्पतिप्लवक खाणाऱ्या बऱ्याच प्रजाती दररोज पृष्ठभागाकडे ऊर्ध्व स्थलांतर करतात. ज्यामुळे दिवसा पृष्ठभागाजवळ आणि रात्री खोल पाण्यात भक्षकांसाठी खाद्य म्हणून जैववस्तुमान उपलब्ध होते. 


क्रीलची व्यावसायिक मासेमारी दक्षिण महासागरात आणि जपानच्या आसपासच्या सागरात केली जाते. यापैकी बहुतेक क्रील स्कॉशिया समुद्रातून मिळतात. मत्स्यशेती आणि मत्स्यालयातील माशांचे खाद्य तसेच स्पोर्ट फिशिंगमध्ये आमिष भक्ष्य, औषधनिर्मिती उद्योगात क्रीलचा वापर केला जातो. जपान, फिलिपिन्स आणि रशियामध्ये क्रीलचा आहारात समावेश केला जातो. जपानमध्ये याला ‘ओकियामी’ म्हणून ओळखले जाते. क्रीलमधील तेल रक्तातील मेद कमी करते असा लोकप्रवाद आहे. क्रील ऑइलचे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. आता क्रीलची मासेमारी आधुनिक पद्धतीने होत असल्याने त्यांच्या संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंटाक्र्टिक सागरी जीवन संसाधन संवर्धन (सीसीएएमएलआर) आयोग याबाबत शाश्वत उपाय शोधत आहे.


🖊 डॉ. बाळासाहेब कुलकर्णी

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- ४ जुलै २०२३

==============

सागरी जलातील विरघळलेले वायू

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 सागरी जलातील विरघळलेले वायू 


सागरी पाण्यात कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन व ऑक्सिजन हे वायू जास्त प्रमाणात तर मिथेन, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाइड, नायट्रस ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड हे ‘ट्रेस गॅसेस’ खूप कमी प्रमाणात आढळतात. याशिवाय हेलिअम, अरगॉन, क्रिप्टॉन, निऑन, झेनॉन हे नगण्य प्रमाणात व निष्क्रिय अवस्थेत आढळतात.         

वाऱ्यांच्या वहनाने निर्माण होणाऱ्या लाटांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन व ऑक्सिजन हे वायू पाण्यात मिसळले जातात. सागरी वनस्पती प्रकाशसंश्लेषणात कार्बन डायऑक्साइडचा तर सागरी प्राणी श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. सागरी वनस्पती व प्राणी यांच्यात कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन वायूंची चक्रीय देवाणघेवाण होते. सागरी सजीवांच्या जैविक क्रियेद्वारे वा मृत शरीरांच्या विघटनाद्वारेदेखील असंख्य घटकपदार्थ सागरात मिसळले जातात. या घटकांची समुद्राच्या पाण्यासोबत अभिक्रिया होऊन निरनिराळे वायू तयार होतात. नायट्रोजन रासायनिकदृष्टय़ा निष्क्रिय म्हणून त्याचा पाण्यातील स्थैर्यताकाल जास्त असतो. त्यामुळे सागरी पाण्यात त्याचे प्रमाण मुबलक असते. त्या तुलनेत ऑक्सिजनची जलविद्राव्यता दुप्पट असूनही त्याचे सागरी सजीवांद्वारे शोषण अधिक केले जाते म्हणून त्याचे प्रमाण कमी असते. मिथेनची विद्राव्यता खूप कमी असूनही त्याचा वापर सागरी सजीवांद्वारे फारसा न झाल्यामुळे तो समुद्रतळी सेंद्रिय द्रव्यांसोबत गाळात साठलेल्या अवस्थेत राहतो. अतिथंड पाण्यात मिथेन व कार्बन डायऑक्साइड यांच्या मिश्रणातून ‘मिथेन हायड्रेट’ नामक विशिष्ट बर्फ तयार होतो. कार्बन डायऑक्साइडची विद्राव्यता जास्त असून पाण्याशी संयोगानंतर कार्बोनिक आम्ल तयार होते. विद्राव्य स्थितीत कार्बोनिक आम्लाचे हायड्रोजन व बायकार्बोनेटमध्ये आयनीभवन होते. यातील बायकार्बोनेटचा वापर सागरी प्राणी बाह्य व अंत: कंकालासाठी करतात.  सल्फर डायऑक्साइडची जलविद्राव्यता जास्त असूनही, त्याची पाण्याशी जलद अभिक्रिया घडून सल्फ्युरिक आम्ल तयार होते. सल्फ्युरिक आम्लयुक्त सागरीजलाचे बाष्पीभवन केल्यावर कॅल्शियम, मॅग्नेशियम, मँगेनिजसोबत संयोग घडून जिप्सम, अनहायड्रेट, इप्समसारखे खनिजयुक्त क्षार मिळविता येतात. सागरी सजीवांची विविधता व विपुलता, सागरीजलाचे तापमान, क्षारता, सामू मूल्य, विविध संयुगांच्या अभिक्रियेची गती, ध्रुवापासूनचे अंतर, पाण्याची खोली व दाब अशा पाण्यासंबंधी असंख्य घटकांवर या वायूंचे प्रमाण अवलंबून असते. कमी क्षारतेच्या थंड पाण्याची वायूधारण क्षमता अधिक असते. तापमान वाढल्यास  सागरी पाण्यातील वायूंची विद्राव्यता कमी होते. अतिखोल ठिकाणी दाब जास्त असल्याने ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते.


 🖊 डॉ. वंदना मुंडासे

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- ३ जुलै २०२३

==============

Friday, 30 June 2023

तंत्रस्नेही युवा संशोधक

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 तंत्रस्नेही युवा संशोधक


सुप्तावस्थेतील बीज, पोषक वातावरणात तरारून उठते तसेच काहीसे डॉ. विशाल भावे यांच्या सागरी विज्ञानप्रेमाबद्दल म्हणता येईल! समुद्रकिनाऱ्यावरील रत्नागिरीसारख्या नगरात राहत असल्यामुळे समुद्राविषयी कायमच विशेष ओढ असलेला हा तरुण त्याच्या सागरी संशोधनाच्या क्षेत्रात मुसंडी मारून सागरी जैवविविधतेचा आंतरराष्ट्रीय अभ्यासक बनला.


लहानपणी शाळेत असल्यापासून चौकस वृत्तीमुळे किडे, मासे पकडून त्यांचे निरीक्षण करण्याची सवय त्यांना लागली आणि त्यातून संशोधनाची गोडी निर्माण झाली. रत्नागिरीच्या गोगटे महाविद्यालयात ‘मत्स्यप्रक्रिया तंत्रज्ञान’ हा विषय कनिष्ठ महाविद्यालयात आणि प्राणीशास्त्र हा विषय पदवीसाठी शिकताना त्यांची सागरी जीवशास्त्राशी ओळख झाली. २००४ साली भाटय़े खाडीवरील संशोधन प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच संशोधनाची दिशा पक्की झाली. मुंबईच्या कीर्ती कॉलेजमधून समुद्रशास्त्र या विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली. यानंतर ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’त काम करत असताना या संस्थेचे रत्नागिरी येथे संशोधन केंद्र उभारण्याची मोठी संधी मिळाली. रत्नागिरी आणि आजूबाजूच्या किनाऱ्यांवरील जैवविविधतेचा विशेषत: समुद्र गोगलगायींची नोंद व अभ्यास करताना जवळजवळ ८० विविध प्रकारच्या प्रजाती त्यांना आढळून आल्या. यापैकी कित्येक प्रजाती भारतात प्रथमच सापडल्या तर काही नव्या प्रजातींचीही नोंद करण्यात आली. यांतील ४ नवीन प्रजाती त्यांच्या नावावर नोंदल्या गेल्या आहेत. या त्यांच्या विशेष कार्यासाठी त्यांना २००९ मध्ये सेंच्युरी आरबीएस अवार्डसतर्फे ‘यंग नॅचरलिस्ट’ आणि अलीकडेच ‘दै. तरुण भारत’ यांचा ‘तरुण संशोधक’ पुरस्कार त्यांना मिळाले.


डॉ. भावे यांचे विविध सागरी जीवशास्त्रासंबंधी २० शोधनिबंध आणि ८ तांत्रिक अहवाल विविध प्रख्यात विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील समुद्रजीवांच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असे ‘महाराष्ट्राची सागरी संपदा’ ही मराठीतील मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी लिहिली. भौगोलिक माहिती प्रणाली, दूरस्थ संवेदन यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सागरी अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्गीकरण, त्यांच्या अधिवासांचे जतन करण्यावर त्यांचा भर आहे. सध्या ‘सृष्टी कॉन्झर्वेशन फौंडेशन’या संस्थेत सहसंचालक म्हणून कार्य करताना लक्षद्वीपमधील प्रवाळभित्तिकांचे संरक्षण, ‘निसर्ग’ व ‘तोक्ते’ चक्रीवादळांपासून सागर किनाऱ्यांच्या संरक्षणामध्ये कांदळवनांची भूमिका याचा अभ्यास करण्यात ते व्यस्त आहेत.


🖊 रेणू भालेराव

office@mavipamumbai.org

=====================

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन अर्जुन खंडाळे 

              - चाळीसगाव

दै लोकसत्ता

दिनांक- ३० जून २०२३

======================

स्वच्छ किनाऱ्यांचे मॉरिशस बेट

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 स्वच्छ किनाऱ्यांचे मॉरिशस बेट


हिंदूी महासागरातील आफ्रिकन खंडाच्या आग्नेय आणि भारताच्या नैर्ऋत्य किनारपट्टीवर स्थित मॉरिशस हे बेट ‘राष्ट्र’ असून त्याचे क्षेत्रफळ १८६५ चौरस किलोमीटर व त्याची किनारपट्टी ३३० किलोमीटर आहे. हे बेट ज्वालामुखीमुळे आठ दशलक्ष वर्षांपूर्वी पाण्यातून उदयास आले. प्रवाळ खडकांनी (कोरल रिफ) बेटाच्या सभोवतालचे ८७० किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे. येथील कोरल रिफ जगातील सर्वात श्रीमंत सागरी खजिन्यांपैकी एक आहेत. हे हिंदी महासागरातील जैवविविधता संवेदनशील क्षेत्रांपैकी (हॉटस्पॉट्स) एक असून फक्त येथेच काही विशिष्ट जातींचे प्रवाळ दिसतात. येथील समुद्राचे वैशिष्टय़ म्हणजे हिंदी महासागरातील इतर ठिकाणांच्या तुलनेत येथे शैवालांची संख्या मोठी आहे. लाल, हिरव्या आणि तपकिरी शैवालांच्या एकूण ४३५ प्रजाती येथे आढळतात. जगभरात अन्न आणि औषधांचा स्रोत म्हणून शैवाल मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते.


मॉरिशसचे समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ असून किनाऱ्यांलगतचे पाणी नितळ पारदर्शक असल्यामुळे तळ सहज दिसतो. किनाऱ्यांवर लाटा आदळत नाहीत पण किनाऱ्यांपासून लांबवर पाण्यात त्या दिसतात. येथे बोटीतील पारदर्शक काचेतून किनाऱ्यापासून लांबवर खोल पाण्यात असणारे रंगीबेरंगी मासे, इतर जीव पाहता येतात व डॉल्फिनबरोबर पोहताही येते. ‘मॉरिशस सागरशास्त्र संस्था’ बेटा सभोवतालच्या महासागराच्या विविध पैलूंवरील संशोधनात अग्रभागी आहे. याशिवाय ‘अल्बियन मत्स्य संशोधन संस्था’ (एएफआरसी) ही सागरी संसाधन विशेषत: मत्स्य संशोधन आणि ब्लू इकॉनॉमीवर कार्य करते. हिंदी महासागराच्या किनारपट्टीतील देशांसाठी सागर संशोधन आणि इतर कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘इंडियन ओशन रिम असोसिएशन’चे (आयओआरए) मुख्यालय मॉरिशस येथे आहे. मॉरिशसमधील प्रवाळ जीवनाचे निरीक्षण करण्यासाठीचे ‘ब्लू बे मरिन पार्क’ हे सर्वोत्तम ठिकाण आहे. ते ३५३ हेक्टरवर पसरलेले आहे. दक्षिण-पूर्वेकडील माहेबर्ग गावाजवळच्या खाडीतील ‘ब्लू बे’ ही उल्लेखनीय जैवविविधता असलेली प्रवाळ बाग आहे. येथील पाच मीटर व्यासाचे हजार वर्षांपेक्षा जुने ‘ब्रेन कोरल’ हे (लोबोफिलिया प्रजाती) मुख्य आकर्षण आहे. या पार्कमध्ये मासेमारीस बंदी असल्याने ३८ प्रवाळ आणि ७२ माशांच्या प्रजाती सुरक्षित असून त्या येथे मोठय़ा प्रमाणात आढळतात.


🖊 डॉ. बाळासाहेब कुलकर्णी

office@mavipamumbai.org

=====================

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन अर्जुन खंडाळे 

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- २९ जून २०२३

======================

Wednesday, 28 June 2023

समुद्र खारट का?

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 समुद्र खारट का?


पिण्यायोग्य पाण्यात अल्प प्रमाणात क्षार विरघळलेले असतात. असे पाणी (गोडे पाणी) पावसामुळे, नद्यांमधून आणि बर्फ वितळल्याने तयार होते. इतर गोडय़ा पाण्याच्या स्रोतांतही अल्प प्रमाणात क्षार विरघळलेले असतात. त्यांची चव आपल्या जिभेला जाणवत नसल्याने ते पाणी खारट लागत नाही. समुद्रातील पाणी मात्र खारट लागते. समुद्राच्या पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण ग्रॅम प्रति लिटर म्हणजे ‘पार्ट पर थाउजंड’मध्ये (पीपीटी) मोजण्याची पद्धत आहे. पीपीटी हे क्षारता मोजण्याचे एकक आहे. सागरी पाण्यातील एकूण क्षार ३५ ग्रॅम प्रति लिटर असतात. त्यात प्रामुख्याने सोडिअम क्लोराईड, मॅग्नेशिअम क्लोराईड, कॅल्शिअम, पोटॅशिअम यांची सल्फेट संयुगे, कॅल्शिअम काबरेनेट, यांचे  क्षार विरघळलेले असल्याने पाणी खारट होते. 


कमी अक्षांशांच्या ठिकाणचे सागर अधिक क्षारता तर जास्त अक्षांशाच्या पट्टय़ातील सागर कमी क्षारता दर्शवतात. सूर्यप्रकाशाची तीव्रता हे याचे थेट कारण आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्याची क्षारता ३६-३७ पीपीटी तर बंगालच्या उपसागराची क्षारता प्रमाण कमी असते, कारण सहा नद्या भारतातून आणि चार महानद्या म्यानमारमधून बंगालच्या उपसागरास मिळतात.


काही सरोवरे ‘सॉल्ट लेक्स’ म्हणून ओळखली जातात. बुलढाण्यातील लोणार सरोवर १०० पीपीटी क्षारतेच्या पाण्याचा आहे. हा जलाशय बंदिस्त असून त्यातील पाणी केवळ बाष्पीभवनानेच बाहेर पडते. पाण्याचे बाष्पीभवन होते तेव्हा विरघळलेले क्षार मागे राहतात. शिवाय नद्यानाल्यांचे पाणी कोणत्याही जलाशयात मिसळताना अधिकच क्षार त्यात सोडते. उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने क्षारता अधिकाधिक वाढते. वर्षांनुवर्षे या प्रक्रियेमुळे असे जलाशय खारट झाले. हीच प्रक्रिया समुद्राच्या बाबतीत अब्जावधी वर्षांपासून सुरू आहे आणि म्हणून समुद्र खारट झाले आहेत. महासागरांतील तळाच्या खडकातून झिरपलेल्या गरम पाण्यातून (हायड्रोथर्मल व्हेंट्स) आणि खोल पाण्यातील ज्वालामुखींच्या उद्रेकामुळेदेखील क्षार समुद्राच्या पाण्यात मिसळतात.


असे असले तरी महासागराची क्षारता प्रमाणाबाहेर वाढत नाही, कारण काही प्रमाणात समुद्रतळाशी खनिजे निर्माण होण्यासाठी तसेच जीवसृष्टीच्या आवश्यक जीवनप्रक्रियांसाठी समुद्रजलातील क्षार वापरले जातात. समुद्रजलातील नेमकी लेश मूलद्रव्ये (ट्रेस एलिमेंट्स) काही सागरी प्राणी टिपून घेतात. जसे व्हॅनॅडीअम समुद्रकाकडी हा कंटकीचर्मी, शेवंड आणि शिणाणे हे कोबाल्ट तर मृदुकाय निकेल टिपतात.


🖊 डॉ. बाळासाहेब कुलकर्णी

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- २८ जून २०२३

==============

समुद्र हा प्रथिनांचा उत्तम स्रोत!

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 समुद्र हा प्रथिनांचा उत्तम स्रोत!


शरीराच्या योग्य वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी आपल्याला मोठय़ा प्रमाणात प्रथिनयुक्त पदार्थाचे सेवन करणे आवश्यक असते. समुद्रातील विविध खाद्यजीवांमुळे प्रथिनांची ही गरज सहज पूर्ण होऊ शकते. 


टय़ूना माशापासून मिळणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण तितक्याच वजनाच्या कोंबडीच्या मांसापेक्षा जास्त असते. कॉड, तारल्या, रावस हे मासे प्रथिनांचे स्रोत आहेतच; त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणाऱ्या ‘ओमेगा-३’ या मेदाम्लांमुळे शरीरासाठी अधिक पोषक आहेत. कॉडमाशांच्या यकृतापासून मिळणाऱ्या तेलात मोठय़ा प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वही असते. वरील माशांबरोबरच बांगडा, बोंबिल, सुरमई, घोळ, वाम, हलवा यांसारखे मासे प्रथिनस्रोत म्हणून आवडीने खाल्ले जातात. माशांप्रमाणेच समुद्रातील इतर प्राणी जसे कोळंबी, कालवं, तिसऱ्या, शिणाणे, माकूळ इत्यादीदेखील मोठय़ा प्रमाणात प्रथिने पुरवतात. यांच्यामधील प्रथिनांचे प्रमाण कोंबडीच्या मांसामधील प्रथिनांइतकेच असून ती पचनास हलकी असतात. शिवाय लोह, जस्त, ‘ई’ जीवनसत्त्वही मोठय़ा प्रमाणात यातून मिळते. शेवंडे प्रथिनांबरोबर कॅल्शिअम आणि फॉस्फरसही पुरवतात. खेकडय़ापासूनही खूप मोठय़ा प्रमाणात प्रथिने, क्षार मिळतात. त्यात ‘ब’ जीवनसत्त्व, सेलेनिअम, फॉस्फरस, पोटॅशिअमसुद्धा मिळते. चिंबोऱ्या, करंदी, माकुळ, कालवं (ऑयस्टर) आणि ऑक्टोपस यांपासूनही विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. हे सर्व समुद्री प्राणी प्रथिनांबरोबर शरीरास आवश्यक अशी अमिनो आम्लेही पुरवतात. त्यांच्यामध्ये कबरेदके कमी असल्यामुळे शरीरात कमी उष्मांक जातात. चवदार खाऊनही वजन कमी ठेवण्यासाठी यांच्यासारखे दुसरे अन्न नाही हे खरेच!


शाकाहारी लोकांच्या प्रथिन आहाराची गरजही समुद्र पूर्ण करतो. विविध प्रकारच्या सागरी वनस्पतींमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रथिने आढळतात. सागरी शैवालांपासून अनेक देशांमध्ये स्वादिष्ट पदार्थ बनवतात. जपानमध्ये सुशी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे ‘नोरी’ हे तांबडे शैवालच आहे. यामध्ये जवळजवळ ५० टक्के प्रथिने असतात. जांभळा लावेर, डलसे, उल्वा हे व यांसारख्या अनेक मोठय़ा आकाराच्या प्रथिनयुक्त शैवालांची मृदाहीन शेतीमध्ये लागवड करून विक्री करतात. काही सूक्ष्मशैवाल म्हणजेच एकपेशीय वनस्पतीसुद्धा मोठय़ा प्रमाणात प्रथिने पुरवतात. वनस्पतीजन्य पदार्थामध्ये न आढळणारे ‘ब’ जीवनसत्त्व यात मोठय़ा प्रमाणात असते. प्रथिने व इतर पोषकद्रव्यांच्या गोळय़ा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे स्पिरुलिना हे असेच नीलहरित शैवाल आहे. प्रथिनांची कमतरता असणाऱ्या लोकांसाठी समुद्री आहार हे वरदानच आहे!


🖊 रेणू भालेराव

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक-  २७ जून २०२३

==============

आंतरराष्ट्रीय नाविक दिन

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 आंतरराष्ट्रीय नाविक दिन


अनेकदा वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर मोठा त्याग करून जगाच्या अर्थव्यवस्थेला आणि जागतिक व्यापाराला मोलाचा हातभार लावणाऱ्या नाविकांच्या सन्मानार्थ २५ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय नाविक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटना’ (इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशन, आयएमओ) जगभरातील दर्यावर्दी देशांची सरकारे, नौवहन कंपन्या, या व्यवसायाशी संलग्न संस्था, जहाजमालक इत्यादी संबंधितांना हा दिवस अर्थपूर्ण रीतीने साजरा करण्याचे आवाहन करते. २०१० साली मनिला (फिलिपीन्स) येथे हा दिवस दरवर्षी साजरा करण्याचा प्रघात ठरावाद्वारे करण्यात आला आणि २०११ सालापासून तो दिवस नियमितपणे पाळण्यात येतो. संयुक्त राष्ट्रांतर्फे ‘जागतिक पातळीवर साजरे होणाऱ्या’ दिवसांच्या यादीत याचा समावेश करण्यात आला आहे.


सुरुवातीपासूनच हा दिवस समाजमाध्यमांद्वारे साजरा करण्याचे आवाहन आयएमओने केले आहे. या दिवशी सर्वसंबंधितांना फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इ. समाजमाध्यमांमधून ‘थँक्स टू सीफेर्स’  हा संदेश देण्याची विनंती करण्यात येते आणि त्याशिवाय या पेशाविषयी काही प्रेरणादायी ब्लॉग किंवा चर्चा ‘लिंकड् इन’ आणि ‘यूटय़ूब’वरही पोस्ट केल्या जातात. या दिवशी जगाला, आपली निरंतर सेवा करणाऱ्या १५ लाख नाविकांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते.


जगात मालाची जी काही वाहतूक होते, त्यापैकी ९० टक्के माल जहाजे वाहून नेतात. तेही, पर्यावरणाचे विशेष नुकसान न करता. या केवळ तांत्रिक माहितीशिवाय जनमानसात असलेली नाविकांची प्रतिमा वास्तविक असावी यासाठी रोजच्या जीवनात त्यांना खवळलेल्या समुद्रापासून चाचेगिरीपर्यंत कोणकोणत्या अव्हानांना तोंड द्यावे लागते, या सगळय़ा गोष्टींची जगाला माहिती मिळावी हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. या वर्षी ‘मारपोल’ (मरिन पोल्युशन प्रिव्हेन्शन कन्व्हेन्शन) या नियमावलीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त ‘सागरी पर्यावरण सुरक्षेमध्ये नाविकांचे योगदान’ या विषयाकडे जगाचे लक्ष वेधणे, ‘पर्यावरणाशी आमची बांधिलकी कायम राहील’ असा विश्वास जनमानसात दृढ करणे हा या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय नाविक दिनाचा कार्यक्रम आहे.


🖊कॅप्टन सुनील सुळे

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- २६  जून २०२३

==============

Saturday, 24 June 2023

शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन

 आदरणीय मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन

 

जुन महिना----------------

1) SMC मिटिंग आयोजन 14/6

2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.

3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन

4) Student pramotion करणे.

5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.

6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.

7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.

8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.

9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 

10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड

11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे.

12) Staff Attach-deteach करणे.

13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6

14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ

15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.

16)शा.पो.आ. करारनामा करणे.

17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.

18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.


जुलै महिना----------------

1) माता-पालक संघ सभा

2) सरल st. request-coinfirm पाठविणे.

3) मीना राजु मंच सभा

4) SMC मिटिंग

5) कथाकथन स्पर्धा आयोजन

6) शा.पो.आ.सभा

7) दिंडी उपक्रम आयोजन

8) पालक सभा आयोजन

9) आदर्श परिपाठ तयारी

10) गुरुपोर्णिमा उपक्रम

11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी

12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी

13)पायाभुत चाचणी 1 आयोजन 


आँगस्ट महिना------------------

1) Student माहिती online भरणे.

2) शिक्षक -पालक संघ सभा

3) SMC मिटिंग आयोजन

4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी

5) सरल school portal भरणे.

6) सरल Staff portal भरणे.

7) गोपाळकाला(दहिहंडी)उपक्रम 

8) अकारिक चाचणी १ आयोजन

9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन

10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8

11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन

12) परिसर सहल आयोजन


सप्टेंबर महिना-----------------

1) माता-पालक संघ सभा

2) संच मान्यता portal भरणे.

3) गणपती उपक्रम 

4) SMC मिटिंग

5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.

6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.

7) शा.पो.आ.सभा

8) मीना राजु मंच सभा

9) पालक सभा आयोजन

10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.

11) पायाभुत online marks भरणे.

12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.

13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.

14)  अध्ययन निष्पत्ती उपक्रम 

15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9


आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना--------------------

1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.

2) सत्र 1 परीक्षा घेणे.

3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन

4) स्वच्छता अभियान राबविणे.

5) SMC मिटिंग

6) दिवाळी अभ्यास नियोजन

7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10

8) नवरात्र भोंडला आयोजन.

9) चित्रकला उपक्रम आयोजन.

10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.

11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी

12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.

13)  पायाभुत चाचणी 2 आयोजन

14) शिक्षक -पालक संघ सभा

15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन

16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10


डिसेंबर  महिना --------------------

1) माता पालक संघ सभा

2) SMC मिटिंग

3) शा.पो.आ.सभा

4) पालक सभा आयोजन

5) कला व क्रिडा स्पर्धा 

6) शैक्षणिक सहल आयोजन

7) Udise+ Online भरणे

8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.

9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम


जानेवारी महिना------------------

1) शिक्षक -पालक संघ सभा

2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम 

3) सा.फुले जयंती उपक्रम 

4) सांस्कृतिक कार्यक्रम 

5) बाल आनंद मेळावा

6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1

7)नेताजी जयंती 23/1

8) नवोदय परीक्षा 5 वी

9) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन


फेब्रुवारी महिना --------------------------

1) माता पालक संघ सभा

2) शा.पो.आ.सभा

3) पालक सभा आयोजन

4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा 

5) आकारिक चाचणी 2 आयोजन

6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी

7) शिवजयंती कार्यक्रम 19/2

8) Udise + online भरणे.


मार्च महिना -------------------------

1) शिक्षक -पालक संघ सभा

2)SMC मिटिंग

3) वार्षिक तपासणी

4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ 

5) शाळेची वार्षिक तपासणी

6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग 

7) SSA online link भरणे.

8) जागतिक महिला दिन 8/3

9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3

10) जागतिक अपंग दिन 17/3

11) संत गाडगेबाबा जयंती 4/3

12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक  नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.


एप्रिल महिना -----------------

1) माता-पालक संघ सभा

2)शा.पो.आ. सभा

3) द्वितीय सत्र परीक्षा 

4) पायाभुत चाचणी 3

5) माँडरेशन तयारी

6) महात्मा फुले जयंती 11/4

7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.

8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.

9) आंबेडकर जयंती 14/4

10) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी


मे महिना ----------------------

1)निकाल जाहीर करणे 

2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.

3) पुढील वर्ष वर्गवाटप,

4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.

5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.

6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल

7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन.

 --------------------------------------------


करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...