करिअर निवडतांना.....
नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुटका थोड्या वेळासाठी आहे.कारण त्याच्यापुढे आता एक नवीन Mission असेल. ते म्हणजे करिअर ..!
आता करिअरच्या दृष्टिकोनातून कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचे असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या मनात असतो.आणि त्या पेक्षा जास्त चिंता असते ती पालकांना...विद्यार्थ्यांची वयोमानानुसार निर्णय क्षमता तेवढी प्रगल्भ नसल्याने विद्यार्थी जास्तीत जास्त पालकांच्या निर्णयावर अवलंबून असतात.
थोडक्यात पालक सांगतील ते आम्ही करू असे सहज बोलून जातात. काही विद्यार्थी आपल्या परिचयातील व्यक्तीचे यश व जीवनशैली चे अनुकरण करण्याची इच्छा मनात ठेवून त्या व्यक्तीने निवडलेले क्षेत्र निवडतात.
10वी व 12 वी च्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये नातेवाईक पेक्षा मित्रांची BONDING तीव्र असल्याने ते मित्र जे करिअर निवडेल किंवा कॉलेज मध्ये प्रवेश घेईल तिथेच मी प्रवेश घेईल अशी भावना असते.
आपल्या पाल्याच्या करिअर निवडण्यात पालकांची सर्वात मोठी चूक म्हणजे दुसऱ्यांच्या मुलांसोबत तुलना करणे तसेच पाल्याच्या करिअरला आपली स्वतःची स्पर्धा समजणे. दुसऱ्यापेक्षा माझ्या मुलाला मोठं करण्याची अपेक्षा!
वरील वस्तुस्थिती लक्षात घेता सुरुवातीच्या काळात म्हणजे 10th व 12 th नंतर करिअर हे विद्यार्थी केंद्रीत नसून ते पालक केंद्रित असते.मात्र हेच करियर ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थी केंद्रीत होते. कारण तेव्हा विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता विकसित झालेली असते.ते त्यांचे निर्णय घेण्यात सक्षम असतात.तेव्हा आपले निवडलेले करिअर बरोबर होते की चुकीचे ते समजते.आणि जर निर्णय चुकला असेल तर ते मात्र आपल्या पालकांना दोष देत बसतात.म्हणून पालकांनी आपल्या पाल्याची तुलना दुसऱ्यांसोबत न करता आपल्या पाल्याच्या क्षमता व गरज विचारात घेऊन करिअर निवडले पाहिजे.आपल्या मुलाला / मुलीला कोणते क्षेत्र आवडते त्यापेक्षा ते कोणत्या क्षेत्रात चांगले करू शकतात ते जाणून घ्यावे.त्यांची क्षमता विचारात घेऊन करिअर निवडल्यास पाल्यावर कधीही मानसिक ताण किंवा अभ्यासाचा ताण पडत नाही.आपल्या निवडलेल्या क्षेत्रात ते चांगले असल्याने त्यात प्राविण्य मिळविण्यास त्यांना वेळ लागत नाही.प्राविण्य मिळवल्यानंतर समाजाकडून मिळणाऱ्या कौतुकाचा वर्षाव त्यांना आपण यशस्वी झाल्याची जाणीव करून देत असतो.
करिअर निवडतांना विद्यार्थ्यांनी सुद्धा विचार करणे आवश्यक आहे.आपला मित्र जे क्षेत्र निवडणार आहे म्हणून मी तेच क्षेत्र निवडेल असा अट्टाहास सोडावा. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी वेळ लागतो.म्हणून असे झटपट पैसे मिळवण्याचे स्वप्न सोडून प्रामाणिक प्रयत्न करावे.जे काही क्षेत्र तुम्ही स्वतः किंवा पालकांच्या इच्छेने निवडणार आहेत.त्यात तुम्ही बेस्ट बनण्याचा प्रयत्न करा. त्याचे पूर्ण knowledge मिळवा. अपूर्ण knowledge घेतले तर तुम्हाला नोकरी शोधावी लागते. याउलट तुम्ही जर पूर्ण knowledge घेतले व त्यात प्राविण्य मिळवले तर नोकरी देणारे तुम्हाला शोधत येतात.
करिअर हा आयुष्यातील खूप महत्वाचा निर्णय आहे. त्यात तुम्ही केलेली चूक सुधारण्यात अनेक वर्ष फुकट जातात. त्यामुळे निवडलेल्या क्षेत्रात बेस्ट बनण्याचा प्रयत्न करा. अनेक विद्यार्थी पहिल्यांदा निवडलेले क्षेत्र सोडून इतरच क्षेत्रात करिअर करतात. बरेच विद्यार्थी आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्पुरते काम करून Enjoy करतात. ( जसे.- महागडे फोन घेणे, गाडी घेणे) मात्र शैक्षणिक करिअरकडे दुर्लक्ष करतात. परिणामी वयोमान वाढल्याने पश्चात्ताप करण्याची वेळ येते. त्यामुळे करिअर बाजूला ठेवून तेच काम चालू ठेवावे लागते.काही अपवाद विद्यार्थी घराच्या परिस्थिती आणि मजबूरीमुळे काम करता करता शिक्षण घेतात.त्यांना परिस्थिती जाणीव असल्याने ते तात्पुरत्या रोजगारापेक्षा मिळणाऱ्या वेळात अभ्यास करून यश प्राप्त करतात.
म्हणूनच करिअर निवडतांना आपल्या क्षमतांचा विचार करा. आपले नातेवाईक किंवा परिसरातील यशस्वी लोकांचा सल्ला घ्या.आपले शिक्षक यांचा सल्ला घ्या. ध्येय निश्चित करायचे असेल तर त्यासाठी वेळ द्या. ध्येयबद्दल पूर्ण जाणून घ्या.अनेक मार्गदर्शक तसेच यशस्वी लोकांचे जीवन चरित्र पडताळून पहा.त्यामुळे त्यांनी केलेली मेहनतीमुळे त्यावरून तुम्हाला प्रेरणा मिळेल. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होणार आहे. आपले करिअर आपल्याच हातात आहे.
आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असलेले विद्यार्थी जीवनात कधीही अयशस्वी होत नाहीत. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ....!!!
भावेश सत्यवान पाटील - लिपिक, मंत्रालय
No comments:
Post a Comment