बदली

Thursday, 4 March 2021

सुंबरान...मराठी चित्रपट...


सुंबरान...मराठी चित्रपट...

गजेंद्र आहीरे यांचा हा चित्रपट बघायच्या अगोदर, एक छोटासा पुर्वाग्रह माझ्या मनात होता की मकरंद अनासपुरे , सिद्धार्थ जाधव आहेत म्हणजे काहीतरी विनोदी मसाला असणार.

पण जेंव्हा सिनेमा चालू होतो आणि एका सुरूवातीच्या सीन मधे मकरंद रेल्वे मधून बायको बरोबर प्रवास करत आपल्या मूळ गावी येत असतो. प्रवासात त्याची नजर समोरच्या सीटवर बसलेल्या एका नवतरुणीवर पडते, ती तरुणी त्याला तरूण वयातल्या पहील्या प्रेमाची आठवण करुन देत त्याला रेल्वेच्या अगोदर आठवणी च्या रुपात त्याच्या गावात घेऊन जाते,  फ्लॅशबॅक मधे मकरंद चा सायकल चालवताना चा सीन अतीशय उत्कृष्ठपणे मनावर कोरल्या जातो, सायकलचे पुढे सरकणारे प्यांडेल व वाऱ्याने ऊडणारा कच्च्या रस्त्यावरील फुफाटा याने सिनेमाचा फ्लॅशबॅक सुरु होतो. 

दिग्दर्शकीय वैचारिक प्रग्ल्भता, जाणीवेची खोली, वेदनांची झुळूक, मनाचा ठाव, अंतकरणात गहीवरलेला व भावनांचा गजबजलेला गाव असा काही माझ्या मनाला  स्पर्श करून गेलाला हा ' गजेंद्र आहीरे ' यांचा ' सुंबरान' नावाचा सिनेमा आहे. 

सिनेमा म्हणण्यापेक्षा एखादी ऊचंबळून आलेली दुखःची लाट कुणाच्या तरी गळ्यात रडून आपण मोकळी करतो ना ती म्हणजे ' सुंबरान'....

प्रत्येक पिढीत त्या त्या पिढीचे, संस्कारीक, धार्मिक, आर्थिक, पारंपरिक, रूढीमय, माणसीक , शारीरिक असे एक ओझे घेऊन सगळे तरून बाल्य अवस्थेतून तारुण्यात प्रवेश करतात.

तारुण्यात येणं सोपं असतं पण ते जगणं, जोपासनं, सोसणं, अनूभवनं हे प्रत्येक तरुणाचं सारखं नसतं, ते वेग-वेगळं असतं प्रत्येकाचं, त्याच्या कौटूंबीक, धार्मिक, आर्थिक, जातीय परिस्थिती नुसार.

काहींसाठी तारूण्य हे आनंददायी सन असतो तर काहींसाठी दुखःचे भोग आणि सजा.

सुंबरान हा आरसा आहे प्रत्येक ग्रामीण भागातील बहुसंख्य तरुणांच्या तारुण्याचा...

अतीशय सात्विक, समतोल आणि सकस अभिनय करून घेतलाय दिग्दर्शकाने आणि केलाय सर्वच अभिनेत्यांनी...

गजेंद्र आहीरे यांचं स्वप्न सत्यात ऊतरवण्यामधे प्रत्येकाचा वाटा तितकाच महत्वाचा आहे...

मकरंद अनासपुरे, वृंदा आहीरे, रवी काळे, रवींद्र मंकनी, आश्वीनी कळसेकर, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अदीती भागवत ई.

या फ्रेम साठी संगीताची साजेशी चौकट दिली ती राहुल रानडे आणि विश्वनाथ मोरे यांनी...

प्रत्येक व्यक्तीच्या पुर्वार्धात व तरुणपणात जाण्यासाठी हा सिनेमा ' टाईम ट्रॅव्हल' म्हणून काम करतो...

ज्यांना वाटतं आपलं जगणं राहून गेलय त्यांनी प्रत्येकानी हा सिनेमा बघावा...


लेखक- दत्ता गायकवाड

(Cinema Gully   facebook साभार)

1 comment:

  1. खूपच सुंदर वर्णन केले आहे चित्रपटाचे आणि गावाचे सुद्धा

    ReplyDelete

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...