थोडंसं....
शाळेचा पहिला दिवस...
आपल्या जि. प. शाळेत शिकत असतांना शाळेच्या ओटीवर शिरूड येथील पुस्तक विक्रेता दत्तू सोनार नवीन करकरीत पुस्तक घेऊन येत असे.पुस्तकांचा तो गंध सर्वत्र ओटीभर पसरत असे.सर्वच पुस्तके आम्हाला नवीन कधीच मिळाली नाही..मागील वर्षाचे विध्यार्थीची पुस्तके मिळाले तरी खूप भरून पावायचो आम्ही मुलं. त्यात दत्तू मामा कडून एखादी नवीन पुस्तकाची,वहीची,पट्टीची खरेची व्हायची ...आणि आनंदाला उधाण यायचं..."तू काय लिन्ह "अशी विचारणा व्हायची , मग काय वस्तू दाखवण्याचा कार्यक्रम....दत्तू मामा यायचा त्या दिवशी आम्हाला अभ्यास नसायचा कारण पूर्ण ओटीभर पालकांची,मुलांची वर्दळ असायची...दत्तू मामा उधारीवरही वस्तू देत असे.…पालक सांगायचे "दत्तूभू पुढला येळले उना का दिसू पैसा" दत्तू मामा त्याच्या कडे पाहून डोळे मोठे करून मान हेलकावून बोलायचे "मांगला भी राहेल शेत " तेव्हा "देसु भो गाव सोडी पई नही चालनुत" हा संवाद हमखास व्हायचा.......जि. प. शाळेत असतांना शाळा दोन सत्रात भरत असे.सकाळ सत्र 7 ते11 वा असायचे. 11 ते 2 पर्यंत विश्रांती असायची, 2 ते 5 परत दुसरे सत्र सुरू व्हायचे.11 ते 2 विश्रांती सत्रामध्ये आदरणीय गुरू श्री.देविदास एकनाथ वाघ हे आम्हा मुलांना अभ्यासासाठी बोलवायचे.आम्हाला अभ्यास देऊन ते विश्रांती घ्यायचे.आमचा अभ्यास झाला की आम्ही मागील मोठ्या खिडकीतुन "खळ्यात" किव्हा "मळ्यात" पसार व्हायचो.येतांना सिझन नुसार खिशात वस्तू असायच्या. चिंच,बोरे,शेंगा या वस्तू देऊन पेन्सिल घेण्याचा हा व्यापार चाले.(पेन पर चीच,पेन पर बोरे असं असायचं)
केवलसिंग,पुंडलिक,अनिल,नारायण,अर्जुन,(भोपाजी),अर्जुन कोळी,दिनेश,एकनाथ,ज्ञानेश्वर,विजयसिंग,चतुर इ बालपणीचे मित्र आज ही त्याच बालपणीच्या नावाने (एकांतात)एकमेकांना आवाज देतो...खूप वेगळे दिवस होते..
असंख्य बालपणीच्या आठवणी आहेत...आदरणीय गुरुवर्य श्री.विश्राम गुरुजी,श्री.सूर्यवंशी, श्री.देविदास वाघ ,श्री शरद पाटील,श्री.लिंगायत,श्री.व सौ.बडगुजर,श्री.व सौ.पोतदार,श्री.वाघ,श्री.पितांबर बोरसे इत्यादी गुरुवर्यानी आम्हा मुलांवर 1ली ते 7 वी पर्यंत शैक्षणिक संस्कार केले. आज ही सर्व चित्र एकद्या चित्रपटाप्रमाणे पुढे पुढे सरकत जातंय...
सजय गरबड मराठे
9421973888
लडाख प्रवास वर्णन खूप छान.आम्हीही लडाखला गेलो होतो,त्याची आठवण वाचतांना होत होती.👌👌👍👍
ReplyDelete