माणसातील कवी
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि लोकमान्य टिळक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.22ते 25 मार्च 2002 च्या दरम्यान नवोदित कवींसाठी काव्यलेखन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन *कवी निरंजन उजगरे* यांनी केले होते.सदर शिबिरामध्ये मी शिबिरार्थी(नवकवी)म्हणून उपस्थित होतो.खरं तर माझं नाव या शिबिरासाठी निवडलं गेलं कसं ?हा प्रश्न मनात घोंगावत होता.
दि.22 मार्च ला मी चिपळूणला रात्री पोहचलो.एका छोट्याशा लॉज मध्ये रात्र काढली.सकाळी उठून टिळक स्मारक वाचन मंदिर गाठलं.समोर रंग गोरा,मध्यम बांधा ,घारे डोळे असलेली व्यक्ती उभी होती.नमस्कार करून मी माझी ओळख सांगितली.त्यांनी त्वरित बसायला सांगितले.चहा घे मग बोलू या असं सुचविले.चहा झाल्यावर मला त्यांनी बोलतं केलं.प्रवासाचा वृत्तांत ऐकला.लोकसत्ता ठाणे वृत्तांत मध्ये "मी आणि माझी कविता"या सदरात तुझ्या कविता वाचल्या ...छान लिहितोस असं सांगितलं....खरं तर तीन/चार महिन्याआधी माझ्या कविता वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या होत्या.त्यांनी ते लक्षात ठेवून मला शिबिरासाठी शिबिरार्थी म्हणून माझं नाव स्वतः आयोजकांना दिले होते ते सरांनी सांगितले. खरं तर खूप भरून आलं होतं.
दि.23 ते25 मार्च 2002 काव्यलेखन शिबिरामध्ये प्रा.रा. रं.बोराडे सर(अध्यक्ष),डॉ.संध्या देशपांडे मॅडम,डॉ.विनोद इंगळहळीकर सर,श्री. राजीव जोशी सर,श्री. अर्जुन डांगळे सर,प्रा.प्रवीण बांदेकर सर,प्रा.प्रज्ञा लोखंडे मॅडम,समारोपाला श्री. मधू मंगेश कर्णिक सर,प्रा.रतनलाल सोनग्रा सर इ. साहित्यिकांचे -विचारवंतांचे विचार ऐकायला मिळाले.काव्य लिखानाची शिदोरी मिळाली.
खरं तर मी सरांचा विद्यार्थी नव्हतो की जवळचा नव्हतो.त्यांनी ही संधी मला दिली,मी कविता छान करतो हा आत्मविश्वास दिला ,प्रेमाने जवळ बसवून चर्चा केली.ह्या सर्व गोष्टी /घटना आजही हृदयाच्या कप्प्यात जशाच्या तशा आहेत.
दि 12/12/2004 रोजी सर आपल्यातून निघून गेलेत. मराठीत लिहिणाऱ्या इतर लेखक कवींप्रति आस्था व प्रेम असणारे *कवी निरंजन उजगरे* सर महान होते.
*त्यांना विनम्र अभिवादन.....!!*💐💐💐 🙏🙏🙏💐💐💐
संजय ग. मराठे
9421973888
उल्हासनगर 4
No comments:
Post a Comment