आर.पी.विशाल यांच्या हिंदी पोस्ट चा अनुवाद.
सर्व श्रेय आर.पी.विशाल यांचे मी फक्त मराठी अनुवाद केलाय...
चित्रपट हे काल्पनिक असले तरी समाजाचा आरसाही असतात. तमिळ, तेलुगु, मल्याळम, मराठी इत्यादी भाषांमधील अनेक छोट्या बजेटच्या चित्रपटांनी मोठे विषय हाती घेतले आहेत, विषय सोडवले आहेत आणि लोकांना समजावून सांगितले आहेत. तमिळ अभिनेत्री ज्योतिका हिचा "मॅडम गीता राणी"नावाचा चित्रपट होता ज्याने शिक्षणाचे व्यापारीकरण आणि राजकीय संबंध सहजतेने दाखवले होते.
सरकारी शाळांची दुर्दशा समजून घेण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा. त्याचप्रमाणे तेलगूमध्ये "शरणम गच्छमी" नावाचा चित्रपट आला होता ज्यामध्ये जात आणि आरक्षण या विषयाला अतिशय तर्कशुद्ध स्पर्श करण्यात आला आहे. जो पर्यंत लोकांना कळणार नाही तो पर्यंत ते कसे बदलतील? एखादी व्यक्ती कोणत्याही कल्पनेवर तेव्हाच ठाम असते जेव्हा त्याला सर्व पैलूंचे सखोल ज्ञान नसते.
प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे विचारांचे वर्तुळ असते, त्यावर तो न्याय्य, श्रेष्ठ आणि सत्य माणून बसलेला असतो, परंतु प्रत्यक्षात हे प्रकरण तितकेच मर्यादित नाही. आमची मते आमच्या श्रद्धा, मान्यता हे पूर्वग्रहांवर आधारित असतात.आणि ते सर्वसाधारणपणे चुकीचे असू शकतात. त्यामुळेच कधी कधी चांगल्या परिणामांसाठी आणि वैचारिक बदलासाठी वैचारिक संघर्षही आवश्यक असतो.
हिंदी चित्रपट आणि हिंदी साहित्य अशा विषयांकडे फारसे लक्ष देत नाही, त्यामुळेच हिंदी क्षेत्रात सखोल चर्चा होत नाही. मी असे म्हणत नाही की दक्षिणेकडे किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये अधिक चांगल्या चर्चा आणि विमर्श होतात, परंतु मला असे म्हणायचे आहे की असंख्य विषयांवर हिंदी भाषिक क्षेत्रात सुरुवात फारच नगण्य आहे, तर तेथे संधी आणि गरज खूप दिसत आहे.
हिंदी लेखन - आर.पी.विशाल.
मराठी अनुवाद- संजय ग. मराठे



No comments:
Post a Comment