पोलीस भरती... एक स्वप्न वास्तवतेचं...!
आज पुन्हा लॉकडाउन लागला...... *जगावे कसे* हा प्रश्न असतानाच एकेक उद्योग बंद होत चालले आहेत. कुणी कुणाला सावराव इतकी भयानक परिस्थिती सगळीकडे. कित्येक शिकले सवरलेले भाजी विकण्यापासून मिळेल ते काम करू लागलेत. सगळंच इतकं अनपेक्षित आहे की बुद्धी सुन्न होते,बरं यातही प्रत्येकाची कुचंबणा वेगळी... काहींना मदत मिळतेय म्हणून चाललंय तर काहींना मदत मागायची कशी हा प्रश्न. सगळेच प्रश्न एरवी सहज मिळणाऱ्या उत्तरांच्या पलीकडे गेलेत; त्यातलाच एक.....
हॅलो सर, 'भरतीचं काय?', भरती होईल की नाही?, असे प्रश्न विचारणारे अनेक फोन दररोज येत असतात. काय उत्तर द्यावे या प्रश्नांना? इकडे कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती चालू असताना या मुलांना भरतीचं पडलंय, पण एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. या उक्तीप्रमाणे दुसऱ्या बाजूचा विचार केला तर या मुलांना कोरोना पेक्षा भरती झाली नाही तर ?...... याचीच भीती जास्त वाटत असते.त्याला कारणही तसंच आहे. मुलांनी आपलं सर्वस्व या भरतीसाठी लावलं आहे. म्हणून त्यांचे प्रश्न रास्त आहेत.
एक पोलीस भरती प्रशिक्षण संस्थेचा माजी प्रशिक्षक म्हणून मला प्रश्न पडतो की यांना उत्तर द्यावी की नाही ? आणि दिले तरी यांची तात्पुरती समजूत घालण्यासारखे होईल.कारण सरकार नेहमीच यांना आशेत ठेवत आले आहे.
नाही असं नाही 2018 ला भरती झाली. त्यानंतर मागील तीन वर्ष भरती नाही. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातील मुले आस लावून आहेत की भरती होईल. 2019 ला जाहिरात आली सरकारच्या कोणत्यातरी महापरीक्षा पोर्टलवर फॉर्म भरले गेले. शासन निर्णयानुसार परीक्षेचे स्वरूपही बदलले. प्रथम लेखी त्यानंतर पन्नास मार्कांचा ग्राउंड. भरती होणार या जाहिरातीने मुलं खूश झाली. भरतीसाठी जीव ओतून तयारीला लागली. सर कसा अभ्यास करू? काय करू? अशा प्रश्नांचा आमच्यावर भडीमार होत होता. सर्व तयारी झाली भरतीची. आणि भरती होणार तोच 1 महिन्यापूर्वी संपूर्ण जगात कोरोना महामारीची भयाण लाट पसरली. त्यानंतर सर्व भरतीना महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिली. त्यात भर म्हणजे महापरीक्षा पोर्टल रद्द केले. आत्ता मुलांचं काय अनेक प्रश्न निर्माण झाले. वारंवार सरकारला विचारणा होऊ लागली. तेव्हा कुठे सत्ताधारी मंत्र्यांनी मोठ्या छातीठोकपणे सांगितले पोलीस दलात भरती करणार... तेही 12528 एवढी. (5297+7231).तेव्हा मुले आणखी खुश झाली. सर्व लहान मोठ्या प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश फुल झाले. थोडे दिवस गेले, अजून काहीच अधिकृत घोषणा आली नाही म्हणून पुन्हा एकदा मुलांचा उत्साह कमी झाला... आणि काही काळातच 5297 पदांच्या भरतीची जाहिरात (2019 ला फॉर्म भरून घेतले होते ) त्या भरतीला सरकारच्या भरती प्रक्रियेच्या स्थगितीच्या शासन निर्णयामधून मधून वगळले, असा आदेश शासनाने काढला. मुलांना कुठेतरी आशेचा किरण दिसू लागला.
पुन्हा मुले आपल्या अभ्यासाला लागली. माननीय मंत्री जिथे जातील तिथे आम्ही 12528 भरती करु, दोन महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करू, अमुक महिन्यात भरतीला सुरुवात करू , अशा अनेक घोषणांनी - आश्वासनांनी मुलांच्या मनात भरतीचा दिवा तेवत ठेवला होता.
अचानक राजकीय वर्तुळात भूकंप झाल्या सारख्या घटना घडल्या आणि सर्वात मोठा धक्का या मुलांना तेव्हा बसला जेव्हा गृहमंत्री बदलल्याची बातमी आली .गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी गृहमंत्री बदलले मग गृहमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचं काय? आश्वासनांचं काय? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? मा. गृहमंत्र्यांची जागा एका दिवसात भरू शकतात आणि आमच्या जागा 3 वर्षात भरू शकत नाही असाही प्रश्न त्यांच्या मनात येऊन गेला असेल .एवढं सर्व होत असताना कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने जगाला हैराण केलं आहे आणि या मुलांच्या मनातील उरलीसुरली आशा पण निघून गेली आहे. याचसाठी 'आता पुढे काय होईल ?' म्हणून ते फोन करून आकांताने विचारणा करत असावेत.
आता या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास बांधील म्हणून मुलांना एकच सांगतो की तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. वय वर्ष 18 ते 30 हा आपला उमेदीचा काळ आहे. भरती होईल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही आणि कधी होईल हेही सांगू शकत नाही परंतु अभ्यास चालू ठेवा. घरची जबाबदारी तुमच्या अंगावर असेल, त्यामुळे ती पार पाडण्यासाठी तुम्हाला कामही करावं लागेल. उरलेला वेळ भरतीसाठी द्या.शक्यतो थोडे दिवस कामासाठी गेलात आणि अभ्यासापासून दूर झालात तर भरती आल्यानंतर तुम्हाला तेवढा न्याय भरतीला देता येणार नाही. त्यामुळे तुमचं पोलीस बनायचं स्वप्न हे स्वप्नच राहू शकते. अनेक मुलींच्या मनातील प्रश्न असतो, सर लग्न करू का ? भरतीचं नक्की नाही म्हणून घरचे मागे लागलेत, किती वर्ष झाले ? अजून किती? या मुलींना पण घरच्यांचा उत्तर द्यावं लागतंय नि घरच्यांना वास्तव सोडून चालत नाहीत ....समस्या एकातून दुसरी . कोणाकडेही ठोस उत्तरं नसणारी नि हतबल करायला लावणारी.संवेदनशील माणसाची परीक्षा पाहणारी अशी ही वेळ. एक वर्ष द्या, दोन वर्षे द्या. असे सांगून त्याही थकून गेल्या आहेत. शेवटी आपलं स्वप्न बाजूला ठेवून अनेक मुली संसारांमध्ये मन गुंतवत आहेत . त्याचबरोबर मुलांची आर्थिक आणि सामाजिक कुचंबणा होत आहे.
पण बाकीच्यांचं काय ?संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत ,पात्रता आहे की नाही हे तपासण्यासाठी सुद्धा भरती द्यावी लागते.दरवर्षी होत असती तर आपली पात्रता ओळखून बऱ्याच जणांनी हे क्षेत्र सोडून दुसरे क्षेत्र निवडलेही असतं. पण तशी संधीही या मुलांना मिळालेली नाही. अनेक मुलांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे.
यासाठी मुलांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. जेणेकरून स्वतःच भवितव्य हे एकाच घटकाशी निगडित नसेल. तसेच सरकारने सुद्धा नुसत्या घोषणाबाजी न करता विशिष्ट धोरण ठरवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगा प्रमाणे वर्षा आरंभीच वेळापत्रक जाहीर करून या मुलांच्या परीक्षा वेळोवेळी घेण्यात याव्यात. जेणेकरून यांना परीक्षा ठराविक वेळा मध्ये देता येईल आणि असे अनेक विद्यार्थी या क्षेत्रावर अवलंबून न राहता आपला मार्ग निवडण्यास स्वतंत्र होतील. नाहीतर अशा अनेक विद्यार्थ्यांचा गाळ या क्षेत्रात असाच साचून राहील आणि परिणामी याची दलदल लाखो विद्यार्थ्यांचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असेल.
प्रत्येकाने एकमेकांना सावरण्यासाठी हात देऊन सर्वांनी एकत्रित या परिस्थितीत टिकून राहणं हेच तेवढं वास्तव आजच्या काळात दिसतं.
धन्यवाद!
- भावेश सत्यवान पाटील
लिपिक,मंत्रालय,मुंबई
Ha sir asech prashn padlet amhala agdi barobar lihalay tumhi
ReplyDeleteMulanchya manatil lihlay....kharach reality.....pratyek rajkeey pudharyane mulanche man janun tyanche prashna sodvle aste tar..... ha lekh lihnyachi vel ali nasti.
ReplyDeleteखरी वास्तविकता मांडली आहे. खरंच आज मुलांची हीच अवस्था झाली आहे. काय करावं हा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे.
ReplyDeleteपोलिस भरती देणाऱ्या प्रत्येकाचा मनातील लेखन ..
ReplyDeleteKhup sundar lekh Aahe 👍👍👍
ReplyDeleteThanku so much sir.....ashi sahanubhuti darshavalya baddal.
ReplyDeleteSadhya vidhyarathyanna yachi ch garaj ahe.
A088490
ReplyDeleteHi
ReplyDelete