आदिवासी गावात स्वतःची 10 गुंठे जागा सरकारला 'दान पत्राने ' देवून शिक्षणाची गुढी उभारणाऱ्या या असामान्य दात्याला त्रिवार वंदन....
'छोटी गावे, मोठी मने
फुकटे ( दुर्दैवाने सध्या त्यांची ओळख काही शहरी सुशिक्षित अशी करून देतात)) की स्वबळावर गावाचा विकास साधणारे ' श्रीमंत '??? संवेदना जागृत करणारी 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी' जरूर वाचा.
कमान आदिवासी ठाकरवस्ती. जेमतेम ५० उंबरठ्यांचे, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक गाव.राजगुरुनगर पासून २० की मी आणि मुख्य रस्त्यापासून ४ की मी अंतरावर. सर्वांच्या नजरेपासून दूर आणि म्हणून पूर्णपणे दुर्लक्षित अशी आदिवासी वस्ती. पावसाळ्यात सर्वांपासून तोडली जाते ही वस्ती. अशा भीमा शंकरच्या पायथ्याशी 100 पेक्षा जास्त आदिवासी वस्त्या अजूनही अस्तित्वात आहेत ( पुणे पासून फक्त 40 की मी अंतरावर). हा अव्यक्त समाज कोणालाही दोष न देता आनंदाने राहते.
अनंते ठेविले तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान
याचे तंतोतंत पालन करत जगतो हा समाधानी समाज!!!!
गावाला सुविधां नाहीत पण पुढील पिढी घडविण्यासाठी शाळेची सुध्दा सोय नव्हती. जमिनीच्या शोधात आहोत हे ठराविक उत्तर असे प्रशासनाचे.
![]() |
श्री लालू तत्याबा जाधव गावातील रहिवासी स्वतःची थोडीशी जमीन बाळगून होते. .पुढील पिढीतील मुलांना शिक्षणास मुकल्याने आपल्यासारखेचं आयुष्य जगावे लागणार ही चिंता सदैव सतावत होती त्यांना. मनाची घालमेल स्वस्थ बसू देत नव्हती.१० गुंठे जागा त्यांनी शाळेसाठी सरकारला दान पत्राने दिली. केवढे मोठे दान, अनेक पिढ्या घडविणाऱ्या या दानाची किंमत जो करू शकेल तो थोर!!!
आता मात्र सारी यंत्रणा कामास लागली शाळा उभी राहिली. हेतू उत्तम असल्याने श्री सुरेश नईकरे यांचे सारखा उत्साही आणि अलौकीक नेतृत्व गुण असलेला उमदा शिक्षक मिळाला आणि शाळा उभी राहिली. शाळेची संरक्षक भिंत(१००* ६ फूट ) गावाने वर्गणी काढून श्रमदानाने बांधली.
शहरी जीवन जवळून पाहणाऱ्या मला या गोष्टी ऐकून अंगावर काटे आले आणि पाच मिनिटे निश्चल झालो!!! सहभागी होत देशांकडून दुर्लक्षित राहिलेल्या स्वतःच्या गावाचा आणि ओघाने देशाचा विकास साधणारे हे देशप्रेम भावले मनाला!!! माझ्यातील टीकाकार येथे संपला आणि यात सहभागी होत शाळा सुधारण्याचे नक्की केले. शाळेला ई लर्निग देत शाळा डिजिटल बनविली, सौर ऊर्जा देत वीज बिलातून मुक्ती दिली. या प्रत्येक सुधारणे साठी १५%भाग भांडवल देवून गावातील मोलमजुरी करून उदर निर्वाह करणार्या या ' माणसांनी खूप शिकविले मला.' त्याचा देखभालीचा खर्च सुध्दा संपूर्ण उचलत त्यांनी ' श्रीमंत ' या शब्दाला एक वेगळेच परिमाण दिले.
अशा अनेक ग्रामीण शाळा या ग्रामस्थांच्या दानपत्राने दिलेल्या जागांमुळे अस्तित्वात आहेत हे कळल्यावर मन वेगळ्या दुनियेत जाते आणि चांगल्या माणसाची कमी नाही हे प्रकर्षाने जाणवले. सकारात्मक विचार सर्णीचे असे अनेक पाठ मिळाले मला या वस्त्यामधून फिरताना. दाता या दाना बद्दल कधी शब्द सुधा काढत नाही तोंडातून!!!
अशा अचंबित करणाऱ्या अनेक सत्यकथा माझ्या मनात खोलवर रुजल्या. मला माणूस म्हणून जगण्यास प्रवृत्त केले यांनी!!!!
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे!!
(डॉ माधव नारायण साठे यांच्या फेसबुक वाल वरून)
No comments:
Post a Comment