थोडंसं.....
शोध माणसाचा...
प्रत्येकाचा स्थायीभाव हा वेगवेगळा असतो...उद्भवलेल्या परिस्थितीला प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने सामोरा जात असतो...कधी त्याच्या पदरी अत्यानंदाचे क्षण पडतात तर कधी दुःखाची मालिका सुरू होते...आणि अशा बऱ्या वाईट अनुभवातून तो आपला जीवन मार्ग आक्रमित असतो...
आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला मोठं व्हायचं आहे.जगाच्या रंगमंचावर अनेक चांगले -वाईट मुखवटे परिधान करून आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत हे दाखवण्याची सर्कस चालू आहे.जे चांगलं ते चांगलं अन जे वाईट ते वाईट अस कोणी स्पष्ट सांगत नसल्यामुळे सर्वांचा मार्ग खोल अज्ञानात कुठंतरी जातांना दिसतोय.
खरं तर प्रयत्नाने माणूस 'माणूस' बनत असतो.दुसऱ्याच निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण करायला आपण आता शिकलं पाहिजे.आपल्याला आपल्या मनातील द्वंद्व आपल्या मनातील अंतर्विरोध समजला पाहिजे.अंतर्मनातील द्वंद्व अंतर्मनातील विरोध जेवढं आपण समजून घेऊ तेवढं 'समाज' समजायला सोपं जाईल. द्वंद्व आणि अंतर्विरोध आपल्या आयुष्याचं नवीन नाव आहे.
जीवन मार्ग फुलत अन फुलवत असतांना आपण एकटं काहीही करू शकत नाही.आपलं कुटुंब ,आपले मित्र,सहकारी,शिक्षक,ज्यांनी आपल्या सुखदुःखात आपल्याला संगत केली असे सहृदयी,दूर कुठंतरी शिक्षण नोकरी साठी गेले असता तेथील हॉस्टेल,रूम पार्टनर...असे किती तरी लोकं आपले जीवन फुलवण्याच्या प्रक्रियेत सामील आहेत.आपण हे कधीच विसरता कामा नये.
खरं तर माणसानं अंतर्मुख असलं पाहिजे. निश्चलता आणि सादगी ही अंतर्मनात असली पाहिजे.आतून - बाहेरून आहे तसेच असले पाहिजे.कोणताही बडेजाव आतपर्यंत पोहचता कामा नये.अंतर्मुख माणूस कसा असावा तर आपल्या बाबत स्टेजवर जरी वाह- वाह चालत असेल तरी एका कोपऱ्यात बसून ते ऐकावं पण मंचावर जाऊन उगाच छाती फुलून हार तुरे घेणारा नसावा अस मला प्रामाणिकपणे वाटतं.
आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि आपला गोतावळा याचं भान आपण ठेवलं पाहिजे.आजची पिढी आणि त्यांची व्यक्त होण्याची पद्धत हे आपण डोळसपणे समजून घेऊन आपली पारंपारिक जिद्द सोडून थोडं मोकळं व्हायला आपण शिकलो पाहिजे.
एकांतात एकट राहता आलं पाहिजे.आणि रडताही आलं पाहिजे.
आयुष्याच्या कोणत्याची वळणारवर प्रयत्न न सोडता आपल्यातील चांगल्या माणसाचा शोध घेतला पाहिजे....
संजय ग मराठे
9421973888
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete👍👌
ReplyDeleteथोडक्यात भरपूर खोल जाऊन जे मांडले आहे ते पटले, धन्यवाद
ReplyDeleteजीवनाचा सार आहे. आज जग ज्या दिशेने जात आहे, त्यांना वळण देण्यासाठी हे करायला हवे.
ReplyDelete