🤝 साम्ययोग : दै.लोकसत्ता
📖 एका दर्शनाचा विसर
देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याचे स्वागत अपार हिंसेने झाले. कोणत्याही हिंसेची पहिली झळ समाजातील वंचित घटकांना बसते. विनोबा नेहमीच वंचित घटकांचे पाठीराखे होते. ‘मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो असतो तर माझी अहिंसा डळमळीत झाली असती.’ या उद्गारांवरून त्यांची कळकळ जाणवते. विधायकतेच्या मार्गाने समत्व ही त्यांची कार्यपद्धती असली तरी शासनकर्ते, न्यायालये, यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही तर विनोबा प्रसंगी तीव्र नाराजी प्रकट करत. सेवेतून देशवासीयांची प्रतिष्ठा वाढवणे ही त्यांची उन्नतीची कल्पना होती. ‘मंत्र देतो तो मंत्री. तुमच्याकडे कोणता नवा मंत्र आहे?’ असेही ते मंत्र्यांना विचारत.
या अनुषंगाने स्वातंत्र्य मिळाल्यावर विनोबांनी शिक्षणाची नवीन योजना कशी असावी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. मुलांना सुट्टी द्यावी आणि संपूर्ण अभ्यासक्रमाची फेररचना करावी. विनोबांचा शिक्षणविचार व्यवहारी जगाला झेपणारा नव्हता. सरकारने तो अर्थातच बाजूला ठेवला. अशातच पहिली पंचवार्षिक योजना जाहीर झाली आणि ती पाहून विनोबा संतापले.
अतुल सुलाखे
देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याचे स्वागत अपार हिंसेने झाले. कोणत्याही हिंसेची पहिली झळ समाजातील वंचित घटकांना बसते. विनोबा नेहमीच वंचित घटकांचे पाठीराखे होते. ‘मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो असतो तर माझी अहिंसा डळमळीत झाली असती.’ या उद्गारांवरून त्यांची कळकळ जाणवते. विधायकतेच्या मार्गाने समत्व ही त्यांची कार्यपद्धती असली तरी शासनकर्ते, न्यायालये, यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही तर विनोबा प्रसंगी तीव्र नाराजी प्रकट करत. सेवेतून देशवासीयांची प्रतिष्ठा वाढवणे ही त्यांची उन्नतीची कल्पना होती. ‘मंत्र देतो तो मंत्री. तुमच्याकडे कोणता नवा मंत्र आहे?’ असेही ते मंत्र्यांना विचारत.
या अनुषंगाने स्वातंत्र्य मिळाल्यावर विनोबांनी शिक्षणाची नवीन योजना कशी असावी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. मुलांना सुट्टी द्यावी आणि संपूर्ण अभ्यासक्रमाची फेररचना करावी. विनोबांचा शिक्षणविचार व्यवहारी जगाला झेपणारा नव्हता. सरकारने तो अर्थातच बाजूला ठेवला. अशातच पहिली पंचवार्षिक योजना जाहीर झाली आणि ती पाहून विनोबा संतापले.
दिल्लीला जाण्यासाठी विनोबा निघाले तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की विनोबा यापुढे १२ वर्षे भटकंती करणार आहे. एका अहिंसक क्रांतीचा हा जन्म आहे. हा क्षण मानवतेला दिशा देणारा आणि भारतातील कष्टकऱ्यांना धीर देणारा आहे. रशियन क्रांतीचे वर्णन करताना ‘जगाला धीर देणारे १० दिवस’ असे म्हटले जाते. या अहिंसक क्रांतीचे वर्णन ‘दानदीक्षा देणारा क्षण’ असे करता येईल.
🖊अतुल सुलाखे
jayjagat24@gmail.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलन: सुनील द.महामुनी, भूम
दिनांक- ९ नोव्हेंबर २०२२
No comments:
Post a Comment